मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून एकप्रकारे त्यांच्यामागे निसर्ग हात धुवून लागला आहे. राज्यावर आस्मानी संकटांची मालिकाच सुरु असून, गारपीट, चक्रीवादळं, पूर आणि आता महामारीने राज्य सरकारचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. या आपत्तीत हजारो कोटींचा नुकसान झालं. मात्र, सरकार आणि प्रशासन नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे.
मुख्यमंत्री ठाकरे तळीये गावात दाखल, दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार
दरम्यान, या आपत्तीत झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात राज्य सरकार कमी पडू नये, म्हणून राज्य सरकारकडून या आपत्तींची केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात यावी अशी मागणी दिल्ली दरबारी करण्यात आली. त्यानुसार सर्व्हे देखील झाले, पण केंद्र सरकारकडून अजूनही ही आपत्ती निवारणासाठीची आर्थिक मदत मिळाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
महापालिका रणधुमाळी : भाजपची पुण्यनगरी कोणाकडे? नेतृत्वाच्या संभ्रमात कार्यकर्ते नाराज
राज्यात महामारीच्या दोन लाटा येऊन गेल्या, इतर राज्यांच्या तुलनेत या लाटांची तीव्रता महाराष्ट्रात अधिक होती. यात जीविताची मोठ्या प्रमाणावर हानी झाली, राज्याला अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागला, याच दरम्यान, जानेवारीत २०२० मध्ये गारपीट झाली, जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले, ऑगस्ट २०२० मध्ये विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली, तर ऑक्टोबरमध्ये २०२० मध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली. यात आपत्तींत हजारो कोटींचं नुकसान झालं.
खडसे सोडून गेल्याने भाजपला काही एक फरक पडत नाही! भाजपच्या नेत्याचे मोठे विधान
त्यानंतर पुन्हा २०२१ मध्ये आलेल्या ‘तौक्ते’ने आपला रुद्रावतार दाखवत मोठ्या प्रमाणात हानी घडवून आणली आणि आता कोकणासह मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याने २ वर्षात केंद्राकडे ८ हजार कोटींची मागणी केली आहे, पण केंद्राकडून हा पूर्ण निधी मिळालाच नाही.
‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’ महाड दौऱ्यावरुन भाजपचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
त्यामुळे, “राज्याने मागितलेल्या निकषानुसार मदत निधी मिळणार नसेल, तर निदान केंद्राने त्यांच्या निकषावर असलेली तरी मदत द्यावी, अशी मागणी मदत पुनर्वसन मंत्री विजय वेदट्टीवार यांनी केली आहे.
राज्य सरकारने केंद्राकडे किती मदत मागितली?
- 2020 गारपिटीसाठी 93 कोटी मागणी, केंद्राकडून निधी नाही.
- निसर्ग चक्रीवादळ 1065 कोटी मागणी, केंद्र सरकारने दिले केवळ 268 कोटी
- विदर्भातील पुरासाठी 900 कोटी मागणी, केंद्र सरकारने दिले 151 कोटी
- 2020 च्या अतिवृष्टीसाठी 3721 कोटी मागणी, केंद्रीय पथक येऊन मदत नाही.
- तौक्ते चक्रीवादळ 203 कोटी मागणी, केंद्रीय पथक आले मदत नाही
Read Also :
- नवी मुंबईतील कंत्राटी कामगारांचा कोव्हिड भत्ता रखडला: महापालिकेने मागितली आणखी ७ दिवसांची मुदतवाढ
- मन सुन्न करणारी घटना! एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, आख्खं गाव स्मशानात बदललं, ४० मृतदेह एका रांगेत
- जनता पुरात, पालकमंत्री रात्रीत मुंबईत, “हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री”
- महाराष्ट्रात पावसाचा कहर, पूरग्रस्त भागातील रुग्णांसाठी आरोग्य मंत्र्यांनी केली मोठी घोषणा
- राज्यात पावसाचे थैमान, आता पर्यंत १३६ बळी, ६ जिल्ह्यांत रेड अलर्ट