मुंबई: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तसेच रायगड, रत्नागिरी, साताऱ्यात दरड कोसळून दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील तळीये येथे दरड दुर्घटनेत तब्बल ४४ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही काही नागरिक बेपत्ता आहेत. राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीनंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
हे पण वाचा: हे सरकार ‘शिवशाही’ नव्हे तर ‘शवशाही, भाजपची आघाडी सरकारवर टीका
रायगड जिल्ह्यातली महाड जवळ असलेल्या तळीये गावात दरड कोसळून ४४ नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर अद्यापही अनेक नागरिक बेपत्ता आहेत. घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून शोधमोहिम, बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या तळीये गावाच्या दौऱ्यावरुन भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं, “इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल”.
हे पण वाचा: महाराष्ट्रात पावसाचा कहर, पूरग्रस्त भागातील रुग्णांसाठी आरोग्य मंत्र्यांनी केली मोठी घोषणा
तळीये गावात झालेल्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी तात्काळ विरोधी पक्षाचे नेते सुद्धा दाखल झाले होते. मात्र, मुख्यमंत्री दुसऱ्या दिवशी जात असल्याने भाजपने त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडलेली नाहीये.
हे पण वाचा: राज्यात पावसाचे थैमान, आता पर्यंत १३६ बळी, ६ जिल्ह्यांत रेड अलर्ट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाड दौऱ्यावर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होत आहेत. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होणार आहेत. त्यानंतर दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. दुपारी ३.२० वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील.
Read Also :
- नवी मुंबईतील कंत्राटी कामगारांचा कोव्हिड भत्ता रखडला: महापालिकेने मागितली आणखी ७ दिवसांची मुदतवाढ
- जनता पुरात, पालकमंत्री रात्रीत मुंबईत, “हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री”
- महाराष्ट्रात पावसाचा कहर, पूरग्रस्त भागातील रुग्णांसाठी आरोग्य मंत्र्यांनी केली मोठी घोषणा
- राज्यात पावसाचे थैमान, आता पर्यंत १३६ बळी, ६ जिल्ह्यांत रेड अलर्ट
- दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या गावांसाठी कायमस्वरुपी धोरण करणार – एकनाथ शिंदे