मुंबई: महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४४ लोक ठार झाले आहेत. दरडीखाली अख्खे गावच नेस्तानाबूत झाले असून त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी केली आहे.
हे पण वाचा: राज्यात पावसाचे थैमान, आता पर्यंत १३६ बळी, ६ जिल्ह्यांत रेड अलर्ट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी १२ वाजता सुमारास मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झाले होत. त्यांनतर महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून त्यांचा ताफा तळीये गावामध्ये दाखल झाला. त्यांनी दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी केली. दुपारी ३.२० वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील.
हे पण वाचा: दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या गावांसाठी कायमस्वरुपी धोरण करणार – एकनाथ शिंदे
तळीयेत काय घडलं?
महाड तालुक्यातील तळीये गावात होत्याचं नव्हतं झालं आहे. कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात बदललं आहे. २२ जुलैला दुपारी ४ वाजता डोंगरकडा कोसळला आणि तळीये गावातील जवळपास ३५ घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेली. या ३५ घरांतील जवळपास ७०-८० माणसंही ढिगाऱ्याखाली दबल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
हे पण वाचा: महाराष्ट्रात पावसाचे थैमान, सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला
तळये दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे.अनेक नातेवाईक डोळे लावून वाट बघताय आमच्या नातेवाईक कधी बघायला मिळतील. तळीये गावात रेस्क्यू ऑपरेशन जोरात सुरु आहे. स्थानिक प्रशासनासोबत इतर ठिकाणच्या सुद्धा रेस्क्यू टीम दाखल होत आहेत. ठाणे शहरातील एक रेस्क्यू ऑपरेशन टीम तळीये गावात पोहोचली.
हे पण वाचा: नौदलास मदत कार्य करण्याचे निर्देश माझ्या विनंतीवरुन; संभाजीराजे म्हणतात…
गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली ३५ घरे दबली गेली.
Read Also :
- मन सुन्न करणारी घटना! एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, आख्खं गाव स्मशानात बदललं, ४० मृतदेह एका रांगेत
- जनता पुरात, पालकमंत्री रात्रीत मुंबईत, “हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री”
- महाराष्ट्रात पावसाचा कहर, पूरग्रस्त भागातील रुग्णांसाठी आरोग्य मंत्र्यांनी केली मोठी घोषणा
- राज्यात पावसाचे थैमान, आता पर्यंत १३६ बळी, ६ जिल्ह्यांत रेड अलर्ट
- दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या गावांसाठी कायमस्वरुपी धोरण करणार – एकनाथ शिंदे