नाशिक : राज्यात झालेल्या अतिमुसळधार पावसाने, पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकण पट्ट्यात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे आत्तापर्यंत हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
तसेच, अनके घरे जमीनदोस्त झाली आहेत, पाण्याखाली गेली आहेत, जनावरे वाहून गेली आहेत. या अतिवृष्टीमुळे आत्तापर्यंत १३६ नागरिकांचा मृत्यू झाला असून, हजारो कोटींचे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे तळीये गावात दाखल, दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार
या पार्श्वभूमीवर, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी, पूर ग्रस्त जिल्ह्यांना तात्काळ मदत देण्याचे आदेश दिले असून, पुराने प्रभावित प्रत्येक कुटुंबाला १० कि. गहू-तांदूळ, ५ लि. केरोसीन, ५ कि. डाळ पुरवण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी आहे. तसेच, शिवभोजन थाळ्यांची संख्यादेखील दुप्पट करण्याचे आदेश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
महापालिका रणधुमाळी : भाजपची पुण्यनगरी कोणाकडे? नेतृत्वाच्या संभ्रमात कार्यकर्ते नाराज
दरम्यान, अतिवृष्टीमुळे सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, महाबळेश्वर, सिंधुदुर्ग आणि कोकण पट्टयातील अनेक भागांत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे, जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं असून, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि दरड कोसळल्यानं मोठा फटका बसला आहे. तसेच, हवामान विभागाने या भागाला ऑरेंज अलर्ट दिला असून, पुढील ३-४ दिवस अतिवृष्टी होणार असल्याचे देखील सांगितले आहे.
Read Also :
- खडसे सोडून गेल्याने भाजपला काही एक फरक पडत नाही! भाजपच्या नेत्याचे मोठे विधान
- ‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’ महाड दौऱ्यावरुन भाजपचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
- नवी मुंबईतील कंत्राटी कामगारांचा कोव्हिड भत्ता रखडला: महापालिकेने मागितली आणखी ७ दिवसांची मुदतवाढ
- मन सुन्न करणारी घटना! एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, आख्खं गाव स्मशानात बदललं, ४० मृतदेह एका रांगेत
- जनता पुरात, पालकमंत्री रात्रीत मुंबईत, “हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री”