मुंबई : मागील २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत युतीत झालेल्या अभूतपूर्व वादांमुळे, कित्येक वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यात केंद्रात, राज्यात व पालिकेत अशा सर्वच स्तरांवर काडीमोड झाला आणि ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले.
आणखी एक थरारक घटना; रायगड किल्ल्याजवळच्या हिरकणीवाडीत कोसळली दरड
दरम्यान, राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राज्यातल्या सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी देखील जोरदार तयारी सुरु झाली आहे.
‘कर्जत-जामखेडमध्ये फिल्डिंग करणारेही पाहिले अन् मॅच फिक्सिंग करणारेही; रोहित पवारांची फटाकेबाजी
या पार्श्वभूमीवर, भाजपने देखील शिवसेनेला शह देण्याच्या दृष्टीकोनातून जोरदार रणनीती आखण्याच्या दृष्टीने पावलं उचलली असून, यासाठी भाजपने आमदार प्रसाद लाड आणि आमदार नितेश राणे यांची, भाजप मुंबई महापालिका निवडणूक कोअर कमिटीच्या माध्यमातून, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा पालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीकडून पूरग्रस्त भागांत मदतीचा ओघ सुरु, राज्यावर अजूनही अतिवृष्टीचे महासंकट
त्यामुळे भाजपला मुंबई महापालिकेची सत्ता ‘राणेनीती’च्या द्वारे एकहाती मिळणार का? ती कशी मिळणार? त्यासाठी भाजप पुढची काय रणनीती आखणार? याकडे लक्ष लागले असून, यावेळी सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
Read Also :
- केंद्राने राज्याला दिला नाही आत्तापर्यंत इतक्या कोटींचा आपत्ती निवारण निधी; वडेट्टीवारांनी बोलून दाखवली मदतीची अपेक्षा
- मुख्यमंत्री ठाकरे तळीये गावात दाखल, दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार
- महापालिका रणधुमाळी : भाजपची पुण्यनगरी कोणाकडे? नेतृत्वाच्या संभ्रमात कार्यकर्ते नाराज
- खडसे सोडून गेल्याने भाजपला काही एक फरक पडत नाही! भाजपच्या नेत्याचे मोठे विधान
- ‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’ महाड दौऱ्यावरुन भाजपचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला