मुंबई: अनेकांना वाटतं की आपल्यावर पाळत ठेवली जातीय, आपला फोन कुणीतरी चोरुन ऐकतंय…. हे जरं असं असेल तर देश सुरक्षित आणि स्वतंत्र असल्याचे हे लक्षण नाही, अशी खंत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त करत लोकांवर पाळत ठेवण्यासाठी ‘पेगॅसस’ला कोट्यवधी नाही, तर अब्जावधी रुपये दिले. हा अर्थपुरवठा करणारे कोण, याचा तपास कोणी लावील काय?, असा सवाल शिवसेना सामनाच्या रोखठोकमधून विचारला आहे.
हे पण वाचा: संयमाचा अंत पाहू नका, भाजपचे बोरिवली स्थानकाबाहेर घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन
”मोदी सरकार विरोधकांच्या बेडरूममध्ये घुसले आहे. खासगी आणि व्यक्तिगत अधिकारांचे हे हनन आहे,” असा आरोप काँग्रेसने १८ तारखेच्या संध्याकाळी केला. १९ तारखेस संसदेचे अधिवेशन सुरू झाले. मोदी सरकारने विरोधकांच्या बेडरूममध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय केले? इस्रायलच्या ‘एनएसओ’ कंपनीच्या स्पायवेअर पेगॅसस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील १५०० वर प्रमुख लोकांवर पाळत ठेवली. त्या १५०० लोकांत उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी आणि मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, राजकारणी व दोन केंद्रीय मंत्री यांचा समावेश आहे.
हे पण वाचा: उदयनराजेंची जनतेला आर्त साद, “बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत”
राहुल गांधी यांचे दोन फोन व त्यांच्या सहका्यांच चे नंबरही पाळतीवर ठेवले. राहुल गांधी यांना आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची खात्रीच होती. ते आपला फोन दर सहा महिन्यांनी बदलत होते. श्री. गांधी यांच्याप्रमाणे अनेकांना वाटत होते की, आपला फोन कुणीतरी ऐकतोय, पाळत ठेवली जातेय! देश सुरक्षित आणि स्वतंत्र असल्याचे हे लक्षण नाही.
हे पण वाचा: ‘कृष्णकुंज’वर एकाच मागणीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी, राज ठाकरे लवकरच घेणार मोठा निर्णय!
जगात पेगॅससचा धुमाकूळ
पेगॅससने जगात धुमाकूळ घातला. तीन राष्ट्राध्यक्ष, दोन पंतप्रधान, एक राजा यांच्यासह ५० हजार फोन नंबर पेगॅससच्या हेरगिरी यादीत समाविष्ट होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन, मोरोक्कोचे किंग मोहम्मद, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल टेड्रोस घेबियस हे पेगॅससचे लक्ष्य ठरले. दक्षिण आफ्रिकेतील बहुतेक सर्व लहान राष्ट्रांचे प्रमुख पेगॅससचे ‘टार्गेट’ ठरले. आता प्रश्न इतकाच आहे की, राहुल गांधींपासून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनपर्यंत या सगळ्यांचे फोन चोरून ऐकण्यात कोणाला रस होता?
Read Also :
- उदयनराजेंची जनतेला आर्त साद, “बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत”
- नागरिकांनो स्वत:ला सांभाळा, तातडीने पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार
- आणखी एक थरारक घटना; रायगड किल्ल्याजवळच्या हिरकणीवाडीत कोसळली दरड
- महाविकास आघाडीकडून पूरग्रस्त भागांत मदतीचा ओघ सुरु, राज्यावर अजूनही अतिवृष्टीचे महासंकट
- केंद्राने राज्याला दिला नाही आत्तापर्यंत इतक्या कोटींचा आपत्ती निवारण निधी; वडेट्टीवारांनी बोलून दाखवली मदतीची अपेक्षा