मुंबई : राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी मनविसेनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी आणि मनविसेच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी, अमित ठाकरे यांना विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद द्यावं, यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ‘कृष्णकुंज’ वर जवळजवळ १०० ते १२५ कार्यकर्ते उपस्थित होते.
तळीये दरड दुर्घटना : मुख्यामंत्र्यांच्या भेटीनंतर ३ तासांतच ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!
आदित्य शिरोडकर यांनी, मनसेला सोडचिट्ठी देत नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या जाण्याने मनविसेनेच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी झाली आहे. या पदावर राज यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना मनविसेचे अध्यक्ष करा, अशी मागणी जोर धरत आहे.
आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासह बचावकार्याची टीम घटनास्थळी कशी पोहचली… वाचा सविस्तर…
यावेळी, मनविसेनेचे उपाध्यक्ष सुधाकर तांबोळी, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर, मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पानसांगे, उपाध्यक्ष नितेश खाडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना निवेदन सादर केलं. त्यामुळे राज ठाकरे यांवर विचार करून, मोठा निर्णय घेणार का? याकडे लक्ष लागून आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पूरग्रस्त भागांत जाऊन, लागेल ती मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, त्यांनी मुंबईकरांच्या भल्यासाठी ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांच्यासाठी तरी निदान लोकल प्रवासाची देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
Read Also :
- पुण्यातील लॉकडाऊन बाबत मोठी बातमी! उपमुख्यमंत्र्यांनी केले सूचक विधान
- तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा, स्वत:ला सावरा; मुख्यमंत्र्यांनी पुसले मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू
- संयमाचा अंत पाहू नका, भाजपचे बोरिवली स्थानकाबाहेर घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन
- मुंबई महापालिकेत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने खेळली ‘राणे’नीती
- नागरिकांनो स्वत:ला सांभाळा, तातडीने पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार