पुणे : उपमुख्यमंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आढावा बैठकीसाठी पुण्यात होते. यावेळी त्यांनी, “राज्यातली महामारीची दुसरी लाट ओसरलेल्यात जमा आहे. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येतही घट होत आहे. त्यामुळे, पुण्यातील दुकाने संध्याकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे, मी स्वत: सकारात्मक आहे, पण अंतिम निर्णय सोमवारीच मुंबईतून जाहीर केला जाईल,” असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा, स्वत:ला सावरा; मुख्यमंत्र्यांनी पुसले मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू
यावेळी, “पुण्याचा करोनाबाधित रुग्णांचा दर ३.९% इतका असून १.६% इतका मृत्यू दर आहे. सध्या जिल्ह्यात लेव्हल तीनचे निर्बंध लागू करण्यात आले असून, संभाव्य तिसर्या लाटेचा विचार करता, सर्व उपाययोजनांची तयारी करण्यात आली आहे. तसेच, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना काही सवलती देण्याचा विचार सुरू आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून घेतला जाईल,” असं देखील त्यांनी सांगितलं.
नागरिकांनो स्वत:ला सांभाळा, तातडीने पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार
तसेच, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्याच्या काही भागात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे दरड कोसळून ७६ जणांचा मृत्यू, तर ३८ जण जखमी झाल्याची घटना देखील घडली आहे. या दुर्घटनांमधील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली गेली असून, २१ एनडीआरएफ पथकं, आर्मीची १४ पथकं आणि नेव्हीचा समावेश आहे. ५९ बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. आत्तापर्यंत ९० हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात यश मिळाले आहे” अशी माहिती त्यांनी दिली.
आणखी एक थरारक घटना; रायगड किल्ल्याजवळच्या हिरकणीवाडीत कोसळली दरड
आत्तापर्यंत कुठे किती बळी
रायगड- 47
सातारा- 6
मुंबई उपनगर- 4
पुणे- 1
रत्नागिरी-11
कोल्हापूर- 5
सिंधुदुर्ग- 2
एकूण-76
जखमी-38
बेपत्ता नागरिकांचा आकडा
रायगड- 53
ठाणे- 2
सातारा- 4
एकूण- 59
मृत जनावरांचा आकडा
रायगड- 33
कोल्हापूर- 3
सातारा- 25
सांगली- 8
पुणे- 6
एकूण- 75
90 हजार लोकांचं स्थलांतर
रत्नागिरी- 1200
कोल्हापूर- 40,882
सांगली- 42,573
ठाणे- 2681
रायगड- 1000
सातारा- 734
पुणे- 263
एकूण: 90, 000
Read Also :
- संयमाचा अंत पाहू नका, भाजपचे बोरिवली स्थानकाबाहेर घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन
- मुंबई महापालिकेत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने खेळली ‘राणे’नीती
- महाविकास आघाडीकडून पूरग्रस्त भागांत मदतीचा ओघ सुरु, राज्यावर अजूनही अतिवृष्टीचे महासंकट
- केंद्राने राज्याला दिला नाही आत्तापर्यंत इतक्या कोटींचा आपत्ती निवारण निधी; वडेट्टीवारांनी बोलून दाखवली मदतीची अपेक्षा
- खडसे सोडून गेल्याने भाजपला काही एक फरक पडत नाही! भाजपच्या नेत्याचे मोठे विधान