महाड : तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले.
‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’ महाड दौऱ्यावरुन भाजपचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
‘साहेब, गेल्या दोन दिवसांपासून माझे वडील गायब आहेत… शोध शोध शोधलं पण सापडत नाहीत… मी खूप लांबून आलोय… काही तरी करा…’ असा टाहोच तळीये दुर्घटनाग्रस्तांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर फोडला. कुणी सांगितलं माझे वडील गायब आहेत. कुणी आई गायब असल्याचं सांगितलं. तर, कुणी आमचं अख्खं कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना धीर देत त्यांचं सांत्वन केलं. तसेच राज्य सरकार तुमच्या पाठिशी उभं आहे, असं आश्वासनही या ग्रामस्थांना दिलं.
निसर्ग कोपात आक्रीत घडलं, हे पाहिल्यानंतर, डोंगरदऱ्यातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार आराखडा तयार करेल. वेधशाळा अंदाज व्यक्त करते, पण त्याचं प्रमाण आणि परिणाम कुणालाही सांगता येत नाही. कालपासून सातारा, सांगली, कोल्हापूर भागात खूप तणाव होता. नद्यांचं पाणी शहरात शिरलं आहे, ते पाहता नद्यांच्या वाहत्या पाण्यासाठी वॉटर मॅनेजमेंटचाही आराखडा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल झाले आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी ते पाहणी करत असून त्यांच्याबरोबर मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे हे देखील उपस्थित आहेत.
Read Also :
- संयमाचा अंत पाहू नका, भाजपचे बोरिवली स्थानकाबाहेर घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन
- मुंबई महापालिकेत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने खेळली ‘राणे’नीती
- नागरिकांनो स्वत:ला सांभाळा, तातडीने पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार
- आणखी एक थरारक घटना; रायगड किल्ल्याजवळच्या हिरकणीवाडीत कोसळली दरड
- ‘कर्जत-जामखेडमध्ये फिल्डिंग करणारेही पाहिले अन् मॅच फिक्सिंग करणारेही; रोहित पवारांची फटाकेबाजी