महाड : तळीये कोंडाळकरवाडी वर दरड कोसळली तीस ते पस्तीस घरे असलेली संपूर्ण वाडी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. आमदार भरतशेठ गोगावले आणि विकास गोगावले यांच्या आटोकाट प्रयत्नामुळे युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू झाले. दरम्यान, लागेल ती मदत करणार असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांना सांगितले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत ग्रामस्थांना धीर दिला.
महाराष्ट्रात पावसाचा कहर, पूरग्रस्त भागातील रुग्णांसाठी आरोग्य मंत्र्यांनी केली मोठी घोषणा
अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाड तालुक्यात खूप मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली. अनेक ठिकाणी माणसे, घरे वाहून गेली. त्यामध्ये सर्वात मोठी दुर्घटना म्हणजे महाड तालुक्यातील तळीये गावावर खूप मोठा डोंगराचा भाग कोसळला आणि त्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली संपूर्ण गाव गाडले गेले. दरम्यान, ही बातमी गोगावले यांना बातमी समजताच त्यांनी जिल्हा अधिकारी तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला आणि ताबडतोब सर्व यंत्रणा कामाला लागली.
पण त्याच वेळी खरवली येथे दरड रस्त्यावर आल्यामुळे दुर्घटना स्थळी जाण्याचा मार्ग बंद झाला. गोगावले यांनी ताबडतोब जेसीबी मशीन लावून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला. पण खूप मोठी दरड कोसळल्यामुळे एका मशीनने एवढा मोठा ढिगारा बाजूला करणे अशक्य होते आणि त्यामध्ये पाऊस पडतच होता. काळोख असल्याने वरून पुन्हा जर दरड आली तर ती पण भीती वाटत होती. त्यामुळे सकाळी लवकर खरवली ढालकाटी येथे दोन मशीन लावून दरड बाजूला करण्यात आली आणि मार्ग मोकळा झाल्याबरोबर एनडीआरएफ टीम जेसीबी मशीन दुर्घटना ठिकाणी पोचल्या आणि ढिगाऱ्याखाली अढकलेल्या व्यक्तिंना बाहेर काढण्याचे काम जोमाने सुरू झाले.
काही पुढारी आम्हीच सर्वात पहिले पोचलो अशे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण दुर्घटना घडलेल्या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावरील कोसळलेली दरड जर आमदार भरत गोगावले यांनी काढण्यासाठी रात्रभर मेहनत घेतली नसती तर हे श्रेय घेण्यासाठी आटापिटा करणारे दुर्घटना घडलेल्या ठिकाणी पोचलेच नसते हा त्यांनी विचार करणे गरजेचे होते, असे विकास गोगावले यांनी सांगितले.
Read Also :
- पुण्यातील लॉकडाऊन बाबत मोठी बातमी! उपमुख्यमंत्र्यांनी केले सूचक विधान
- संयमाचा अंत पाहू नका, भाजपचे बोरिवली स्थानकाबाहेर घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन
- मुंबई महापालिकेत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने खेळली ‘राणे’नीती
- महाविकास आघाडीकडून पूरग्रस्त भागांत मदतीचा ओघ सुरु, राज्यावर अजूनही अतिवृष्टीचे महासंकट
- केंद्राने राज्याला दिला नाही आत्तापर्यंत इतक्या कोटींचा आपत्ती निवारण निधी; वडेट्टीवारांनी बोलून दाखवली मदतीची अपेक्षा