चिपळूण : राज्यात अतिवृष्टीने हाहाःकार उडवला असून, राज्याच्या पश्चिम भागांत भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने या प्रदेशातील नागरिकांची परिस्थिती अत्यंत दारुण झाली असून, आत्तापर्यंत कित्येक नागरिकांचे आणि जनावरांचे बळी गेले आहेत, तर तब्ब्ल ९०,००० लोकांचे स्थलांतर केले गेले आहे.
पुण्यातील लॉकडाऊन बाबत मोठी बातमी! उपमुख्यमंत्र्यांनी केले सूचक विधान
या महापुरात अनेकांची राहती घरे वाहून गेली, तर काहींच्या घरात पुराच्या पाण्याने सारं काही उध्वस्त करून टाकलं. अशीच एक उद्धवस्त कहाणी आहे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या एका चिपळूणमधल्या एका कट्टर शिवसैनिकाची. राजू विखारे असं त्यांचं नाव असून, ते शिवसेना विभाग प्रमुख आहेत.
तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा, स्वत:ला सावरा; मुख्यमंत्र्यांनी पुसले मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू
महापुराच्या अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने, त्यांच्या घरात सगळीकडे चिखलाचं साम्राज्य असून, सगळ्या सामानाची नासधूस झाली आहे. “प्रशासनाने ११ वाजता पाणी सोडणार असल्याची सूचना दिली होती, मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी पहाटे ५:३० वाजता पाणी सोडल्याने, आमची तारांबळ उडाली आणि आमचा जीव धोक्यात आला, प्रशासनाच्या या गोंधळी कारभाराचे करायचे काय? त्यांच्यामुळे आज आमची ही अवस्था झाली आहे,” असे सांगत, “मी इथला शिवसेना विभाग प्रमुख आहे, तरीही आमची अशी अवस्था आहे,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.
संयमाचा अंत पाहू नका, भाजपचे बोरिवली स्थानकाबाहेर घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन
तसेच, “हेलिकॉप्टर मदतीसाठी उडतंय, इकडून-तिकडे जातंय, पण लोकांची अवस्था बघायला थांबतंय कुठं?, इथे कुणीही उतरलं नाहीये, लोकांची अवस्था इथे बिकट आहे, दोन दिवस झोप नाही, अंगावर घालायला कपडे नाही, खायला अन्न नाही, पण मदत करण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर नुसतं घिरट्या घालतंय,” असं म्हणत त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उठवले आहे.
नागरिकांनो स्वत:ला सांभाळा, तातडीने पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार
त्यामुळे, आधी महामारीमुळे या सर्व सामान्य लोकांचे कंबरडं मोडलं असताना, या पुराने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुरतं उद्धवस्त करून सोडलं आहे, राजू विखारे यांच्यासारखी अवस्था नई भावना आज नक्कीच प्रत्येक पुरग्रस्ताच्या मनात असणार आहे. त्यामुळे, निदान मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाच्या शिवससैनिकाची साद ऐकणार का? आणि लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत आणि आजूबाजूच्या पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवणार का? हा मोठा प्रश्न आहे.
Read Also :
- महाविकास आघाडीकडून पूरग्रस्त भागांत मदतीचा ओघ सुरु, राज्यावर अजूनही अतिवृष्टीचे महासंकट
- केंद्राने राज्याला दिला नाही आत्तापर्यंत इतक्या कोटींचा आपत्ती निवारण निधी; वडेट्टीवारांनी बोलून दाखवली मदतीची अपेक्षा
- मुख्यमंत्री ठाकरे तळीये गावात दाखल, दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार
- खडसे सोडून गेल्याने भाजपला काही एक फरक पडत नाही! भाजपच्या नेत्याचे मोठे विधान
- ‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’ महाड दौऱ्यावरुन भाजपचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला