मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमधील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. सकाळी १० वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने ते चिपळूणसाठी रवाना होणार आहेत. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे ११ वाजता ते पोहोचतील. त्यानंतर ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील. दुपारी १२.३० वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. त्यानंतर ते दुपारी २.४० वाजता अंजनवेलहून हेलिकॉपटरने मुंबईकडे रवाना होणार आहेत.
हे पण वाचा: ‘कृष्णकुंज’वर एकाच मागणीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी, राज ठाकरे लवकरच घेणार मोठा निर्णय!
चिपळूनमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण परिसर जलमय झाला. सर्वदूर पाणी साचल्याने तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पुराचे पाणी शहरातील अनेक भागात पाणी साचले त्यामुळे अंतर्गत मार्ग बंद झाले होते. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी साचले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली गेल्या होत्या. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजिवन विस्कळीत झाले.
हे पण वाचा: उदयनराजेंची जनतेला आर्त साद, “बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत”
उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले
‘साहेब, गेल्या दोन दिवसांपासून माझे वडील गायब आहेत… शोध शोध शोधलं पण सापडत नाहीत… मी खूप लांबून आलोय… काही तरी करा…’ असा टाहोच तळीये दुर्घटनाग्रस्तांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर फोडला. कुणी सांगितलं माझे वडील गायब आहेत. कुणी आई गायब असल्याचं सांगितलं. तर, कुणी आमचं अख्खं कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना धीर देत त्यांचं सांत्वन केलं. तसेच राज्य सरकार तुमच्या पाठिशी उभं आहे, असं आश्वासनही या ग्रामस्थांना दिलं.
हे पण वाचा: ‘म्हाडा’ने उचलली तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
निसर्ग कोपात आक्रीत घडलं, हे पाहिल्यानंतर, डोंगरदऱ्यातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार आराखडा तयार करेल. वेधशाळा अंदाज व्यक्त करते, पण त्याचं प्रमाण आणि परिणाम कुणालाही सांगता येत नाही. कालपासून सातारा, सांगली, कोल्हापूर भागात खूप तणाव होता. नद्यांचं पाणी शहरात शिरलं आहे, ते पाहता नद्यांच्या वाहत्या पाण्यासाठी वॉटर मॅनेजमेंटचाही आराखडा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल झाले आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी ते पाहणी करत असून त्यांच्याबरोबर मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे हे देखील उपस्थित आहेत.
Read Also :
- “हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेलं”
- उदयनराजेंची जनतेला आर्त साद, “बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत”
- नागरिकांनो स्वत:ला सांभाळा, तातडीने पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार
- आणखी एक थरारक घटना; रायगड किल्ल्याजवळच्या हिरकणीवाडीत कोसळली दरड
- महाविकास आघाडीकडून पूरग्रस्त भागांत मदतीचा ओघ सुरु, राज्यावर अजूनही अतिवृष्टीचे महासंकट