मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे, कोकण भागांत अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. यातलीच सर्वात मोठी दुर्घटना घडली ती, महाड तालुक्यातील तळीये गावात. याठिकाणी डोंगराचा कडा कोसळून, अंदाजे ३० च्या वर घरं दरडीखाली गाडली गेली आणि आता या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५२ झाली आहे. तसेच, ढिगाऱ्याखाली अजून अनेक मृतदेह असल्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, तळीये गावची परिस्थिती पाहिली. यांनतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी, गावाच्या पुनर्वसनाचा उल्लेख केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर, पुढच्या ३ तासांतच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली असून, या गावाच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी आता ‘म्हाडा’ने स्वीकारली आहे,” अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे.
मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती. pic.twitter.com/vdtJLl33gF
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 24, 2021
पुण्यातील लॉकडाऊन बाबत मोठी बातमी! उपमुख्यमंत्र्यांनी केले सूचक विधान
यावेळी त्यांनी ट्विट मध्ये, “कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती,” असं लिहिलं आहे.
तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा, स्वत:ला सावरा; मुख्यमंत्र्यांनी पुसले मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू
त्यांच्या ट्विट मध्ये स्लॅबच्या घराचा आणि कौलारू घराचा नकाशा देण्यात आला असून, एकूण चार फोटो ट्वीट केले आहेत. त्यात 1BHK घराचा प्लॅन देण्यात आला आहे. तसेच, याठिकाणी काय काय होते, याची माहिती शोध कार्य थांबल्यानंतर, तसेच पावसाने उसंत घेतल्यानंतर घेतली जाणार आहे. या घरांना पुढील ३० वर्षे काही होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Read Also :
- संयमाचा अंत पाहू नका, भाजपचे बोरिवली स्थानकाबाहेर घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन
- मुंबई महापालिकेत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने खेळली ‘राणे’नीती
- नागरिकांनो स्वत:ला सांभाळा, तातडीने पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार
- आणखी एक थरारक घटना; रायगड किल्ल्याजवळच्या हिरकणीवाडीत कोसळली दरड
- ‘कर्जत-जामखेडमध्ये फिल्डिंग करणारेही पाहिले अन् मॅच फिक्सिंग करणारेही; रोहित पवारांची फटाकेबाजी