चिपळूण : अतिवृष्टीमुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आलं. त्यामुळे विसर्गानंतर नद्यांच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणावर वाढ झाली. तसेच, मुसळधार पावसामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर साचत राहिले आणि पाण्याचा निचरा होण्याचं प्रमाण, त्यामानाने कमी झाल्याने पाणी साठत राहिलं आणि यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीने सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकण पट्टयातील अनेक भागांत जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं.
“आमचे आई-वडील तुम्ही आहात, आम्हला काहीही करून जगवा…” चिपळूणकरांनी मुख्यमंत्र्यांसमोर फोडला टाहो!
या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज पूरग्रस्तं चिपळूण मधील बाजारपेठ, चिंचखरी नाका आणि अभिरुची हॉटेल येथे येऊन व्यापारी, स्थानिक नागरिक आणि छोटे छोटे व्यवसायिकांची भेट घेतली, त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. यानंतर त्यांनी, रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि आपतकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत देण्याचं जाहीर केलं आहे.
पत्रकार परिषदेतले मुद्दे…
- NDRFच्या धर्तीवर प्रत्येक जिल्हयात एक टीम
हवामान बदलाचा फटका म्हणून ही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, आणि ही वस्तूस्थिती स्वीकारली पाहिजे. त्यामुळे, संकटांचा धोका लक्षात घेता एनडीआरएफच्या धर्तीवर, प्रत्येक जिल्ह्यात एक टीम तयार केली जाणार आहे. तसेच, कोकणात पूर व्यवस्थापन यंत्रणा उभारणार आहोत.
‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, निवेदन पाहून अजितदादा भडकले
- उद्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार
कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात अतिवृष्टीने पूरस्थिती. त्या भागांचाही मुख्यमंत्री उद्या पाहणी दौरा करणार.
- वाऱ्यावर सोडणार नाही, संपूर्ण आढावा घेऊन योग्य ती मदत
पुराने बाधित झालेल्या कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, संपूर्ण आढावा घेऊन, योग्य ती मदत देऊ करण्यात येईल. यात आर्थिक तसेच इतर प्रकारच्या मदतीचाही समावेश असेल. पूरग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत.
चांगल्या-वाईट कामचं प्रशस्तीपत्रं राहू द्या, राजकारण आणि टीका सोडून सध्या पुनर्वसन महत्त्वाचं
- केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी…
केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी, मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा पूर्ण आढावा घेऊन राज्याकडून, तसेच केंद्राकडून काय आणि किती मदत याचा निर्णय घेण्यात येईल आणि मदत दिली जाईल.
- केंद्र सरकारकडून व्यवस्थित मदत मिळत आहे
केंद्र सरकारकडून योग्य आणि व्यवस्थित मदत मिळत आहे. राज्य सरकारचे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांच्याशी संवाद सुरु आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला या भीषण संकटात मदत करत आहेत.
- विमा मिळणार, तांत्रिक अडचणी येणार नाहीत
मोठं नुकसान झालं आहे. पिकांचं, घरांचं, वाहनांचं नुकसान झालं आहे. ज्यांचा विमा आहे. त्यांना कोणत्याही अडचणी येऊ देणार नाही. तांत्रिक मुद्दे उपस्थित होऊ दिले जाणार नाहीत. तसेच, विमाकवच न घेतलेल्यांनाही मदत करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत.
Read Also :
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मत्र्यांची मोठी घोषणा, जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षेची पुन्हा संधी मिळणार
- नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
- “हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेल”
- उदयनराजेंची जनतेला आर्त साद, “बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत”