चिपळूण : अतिवृष्टीमुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आलं. त्यामुळे विसर्गानंतर नद्यांच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणावर वाढ झाली. तसेच, मुसळधार पावसामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर साचत राहिले आणि पाण्याचा निचरा होण्याचं प्रमाण, त्यामानाने कमी झाल्याने पाणी साठत राहिलं आणि यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीने सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकण पट्टयातील अनेक भागांत जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं.
‘म्हाडा’ने उचलली तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
या पार्श्वभूमीवर, तळीये गावाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज चिपळूणमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा तेथील एका महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत, “काही करा पण आम्हाला उभं करा,” अशी मागणी केली, तर व्यापाऱ्यांनी, “आमचे आई-वडील तुम्ही आहात, आम्हला काहीही करून जगवा…” अशी आर्त साद देत मुख्यमंत्र्यांसमोर कर्जमाफीसाठी आणि मदतीसाठी हात पसरले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
मुख्यमंत्री बाजारपेठेत दाखल झाले तेव्हा, काही नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. यावेळी काही नागरिकांनी मुख्यमंत्र्यांसमोरच ठिय्या दिला, तर काही स्थानिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांप्रमाणे आम्हाला देखील कर्जमाफी द्या, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. “तुमचं जे नुकसान झालं आहे, त्याची काळजी करू नका! तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे,” असं आश्वासन त्यांनी दिलं.
नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
यानंतर मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीसाठी पुढे रवाना झाले. या बैठकीनंतर नक्कीच काहीतरी मदतीची घोषणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी अनिल परब, भास्कर जाधव, उदय सामंत, सीताराम कुंटे यांची देखील उपस्थिती होती.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चिपळूण येथे दाखल होताच, चिपळूण बाजारपेठ येथे जाऊन व्यावसायिक, दुकानदार यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच त्यांची विचारपूसही केली. pic.twitter.com/S09ueA982r
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 25, 2021
Read Also :
- ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, निवेदन पाहून अजितदादा भडकले
- चांगल्या-वाईट कामचं प्रशस्तीपत्रं राहू द्या, राजकारण आणि टीका सोडून सध्या पुनर्वसन महत्त्वाचं
- पुन्हा एक हात मदतीचा: कोकणवासीयांसाठी आमदार महेश लांडगेंचे आवाहन
- तळीये दरड दुर्घटना : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्थानिक सांगतील तिथे पक्की घरे बांधून देणार- नारायण राणे
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मत्र्यांची मोठी घोषणा, जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षेची पुन्हा संधी मिळणार