महाड : रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४४ लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रिय मंत्री नारायण राणे कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते आहेत.
पुन्हा एक हात मदतीचा: कोकणवासीयांसाठी आमदार महेश लांडगेंचे आवाहन
यांनतर, आज सकाळी त्यांनी तळई गावची पाहणी केली. यावेळी त्यांनी, “राज्य आणि केंद्र सरकारकडून या जागी पुन्हा चांगली आणि पक्की घरे बांधून देण्यात येतील. तसेच, स्थानिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून, प्रांत स्तरावरच अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधांनानी स्वतः मला या भागाची पाहणी करून अहवाल देण्यास सांगितलं आहे. नुकसानग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी देखील यावेळी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “घडलेली दुर्घटना अत्यंत भीषण आणि दुर्देवी असून, या घटनेचं राजकारण करण्याची किंवा कुणावरही टीका करण्याची सध्याची वेळ नाही. घटनास्थळावरून सध्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. सध्या नुकसानग्रस्तांचं पुनर्वसन करणं अधिक महत्त्वाचं आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी, गावातल्या दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचं सांत्वन केलं. “ही घटना घडल्यानंतर प्रविण दरेकर सर्वात आधी दुर्घटना स्थळी पोहोचले. त्यांनी या ठिकाणी येऊन प्रशासन लवकरात लवकर इथे कसं पोहोचेल, यासाठी प्रयत्न केला. आता एनडीआरएफ युद्धपातळीवर काम करत आहे. नुकसानग्रस्तांना सर्व प्रकारची मदत केंद्राकडून नक्की मिळेल,” असं सांगत त्यांनी, “इथे चांगलं किंवा वाईट काम केल्याचं प्रशस्तीपत्रं देण्यासाठी आलेलो नाही, या दुर्घटनाग्रस्तातील सर्वाचं पुनर्वसन करण्यात येईल,” असं त्यांनी सांगितलं.
Read Also :
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
- नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
- “हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेल”
- उदयनराजेंची जनतेला आर्त साद, “बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत”
- ‘म्हाडा’ने उचलली तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय