रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आलं. त्यामुळे विसर्गानंतर नद्यांच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणावर वाढ झाली. तसेच, मुसळधार पावसामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर साचत राहिले आणि पाण्याचा निचरा होण्याचं प्रमाण, त्यामानाने कमी झाल्याने पाणी साठत राहिलं आणि यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीने सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकण पट्टयातील अनेक भागांत जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं.
आढावा बैठकीनंतर पूर ग्रस्त भागसाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज पूरग्रस्तं चिपळूण मधील बाजारपेठ, चिंचखरी नाका आणि अभिरुची हॉटेल येथे येऊन व्यापारी, स्थानिक नागरिक आणि छोटे छोटे व्यवसायिकांची भेट घेतली, त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. यानंतर त्यांनी, रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि आपतकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत देण्याचं जाहीर केलं आहे.
“आमचे आई-वडील तुम्ही आहात, आम्हला काहीही करून जगवा…” चिपळूणकरांनी मुख्यमंत्र्यांसमोर फोडला टाहो!
दरम्यान, यावेळी दुकानदारांच्या व्यथा समजून घेताना मुख्यमंत्र्यांचे हात जोडले गेले. यावेळी एका व्यापाऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर सर्व व्यापाऱ्यांची व्यथा मांडली. “पूराने आमचं मोठं नुकसान झालं. आमच्यावर बरंच कर्ज आहे. आम्हालाही शेतकऱ्यांच्या धर्तीवर आयुष्यात एकदाच कर्जमाफी द्या. आम्हाला २ % टक्क्याने कर्ज द्या. यानंतर आम्ही कधीही सरकारकडे भीक मागणार नाही. आमचे आई-वडील तुम्ही आहात, आम्हला काहीही करून जगवा…” अशी आर्त साद देत मुख्यमंत्र्यांसमोर कर्जमाफीसाठी आणि मदतीसाठी हात पसरले.
चांगल्या-वाईट कामचं प्रशस्तीपत्रं राहू द्या, राजकारण आणि टीका सोडून सध्या पुनर्वसन महत्त्वाचं
मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच, एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहोच फोडला. प्रचंड रडत ही महिला आपली व्यथा मुख्यमंत्र्यांना सांगत होती. “माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होत्याच नव्हतं झालं. साहेब, तुम्हीच आम्हाला मदत करू शकता. आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका हो! ” अशी धाय मोकलून मागणी केल्यांनतर मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं.
राज्यात आत्तापर्यंत १५० पेक्षा जास्त नागरिकांचा यावर्षीच्या महापुरात मृत्यू झाला असून, यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अधिक आहे. तसेच, हजारो कोटींचं नुकसान आत्तापार्यंत झालं असून, जवळपास नव्वद हजार लोकांचं आत्तापार्यंत स्थलांतर करण्यात आल्याची माहिती शासनाकडून मिळत आहे.
Read Also :
- ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, निवेदन पाहून अजितदादा भडकले
- पुन्हा एक हात मदतीचा: कोकणवासीयांसाठी आमदार महेश लांडगेंचे आवाहन
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मत्र्यांची मोठी घोषणा, जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षेची पुन्हा संधी मिळणार
- नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
- “हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेल”