बीड : केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारांनंतर राज्यात भाजप मध्ये मोठं नाराजी आणि राजीनामा नाट्य पाहायला मिळालं. खासदार प्रीतम मुंडेंची केंद्राच्या मंत्री मंडळात वर्णी न लागल्याने, नाराज मुंडे समर्थकांनी राजीनामास्त्र बाहेर काढले आणि तब्ब्ल १०० च्या वर भाजप पदाधिरकऱ्यांनी आपला राजीनामा दिला.
आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी अचानक दिल्लीवारी केल्याने या सर्व घटना प्रसंगाला नाट्यमय वळण आले होते. या भेटीत त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली, यांनतर त्यांनी थेट पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यांनतर त्यांनी मुंबईत येऊन, नाराज पदाधिकारी आणि समर्थकांना संबोधित करताना, पक्षबदलासोबतच इतर अनेक अफवांना पूर्णविराम दिला.
एकदा शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या, पुन्हा कधीच भीक मागणार नाही! जगण्यासाठी त्यांनी जोडले हात
यावेळी, “मुंडे साहेबांनी हा पक्ष राज्य वाढवलेला असल्याने, मी हा पक्ष सोडणार नाही आणि तुम्हालाही सोडून देणार नाही,” असं म्हणत त्यांनी सर्वांचे राजीनामे नामंजूर केले. तसेच, माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि जे पी नड्डा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका उपस्थित झाल्या, तसेच मुंडे-फडणवीस यांच्यातील वाढणारी दरी देखील अनेकांच्या लक्षात आली.
“आमचे आई-वडील तुम्ही आहात, आम्हला काहीही करून जगवा…” चिपळूणकरांनी मुख्यमंत्र्यांसमोर फोडला टाहो!
यानंतर, आता पुन्हा एकदा भाजप आणि मुंडे यांच्यातील वाढणारी दरी दिसून आली असून, पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली असून, या बॅनरवर भाजपच्या एकाही राज्य स्तरावरील नेत्याचा फोटो छापलेला नाही. त्यामुळे, वाढदिवसानिमित्त छापलेल्या बॅनरवरुन समर्थकांनी आता नाराजी दाखवण्यास सुरुवात केली आहे.
‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, निवेदन पाहून अजितदादा भडकले
दरम्यान, “माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि जे पी नड्डा असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता, राष्ट्रीय नेत्यांचा देखील फोटो छापण्यात आलेला नाही. त्यामुळे आता बॅनरवरुन नवे राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे.
Read Also :
- चांगल्या-वाईट कामचं प्रशस्तीपत्रं राहू द्या, राजकारण आणि टीका सोडून सध्या पुनर्वसन महत्त्वाचं
- पुन्हा एक हात मदतीचा: कोकणवासीयांसाठी आमदार महेश लांडगेंचे आवाहन
- तळीये दरड दुर्घटना : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्थानिक सांगतील तिथे पक्की घरे बांधून देणार- नारायण राणे
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मत्र्यांची मोठी घोषणा, जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षेची पुन्हा संधी मिळणार
- “हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेल”