बंगळूर : गेल्या कित्येक महिन्यांपासून कर्नाटकात सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर आज पडदा पडला असून, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दुपारी जेवणानंतर राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत.
भास्कर जाधवांच्या महिलांबरोबर गैरवर्तणूक आणि अरेरावी नंतर, संजय राऊत म्हणतात….
काहीच दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली होती. यांनतर त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना जोर चढला होता. त्यानंतर आज त्यांनी, राज्यातल्या भाजप सरकारच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी, “पुढचा मुख्यमंत्री लिंगायत समाजातून नको!” असे मोठे विधान केले आहे.
५ दिवसांनंतर तळीयेतील सर्च ऑपरेशन अखेर थांबलं, बेपत्तांना मृत घोषित करा! ग्रामस्थांची मागणी
या पार्श्वभूमीवर, राज्यातील भाजपचे मंत्री मुरुगेश निरानी हे दिल्लीत दाखल झाले असून, ते पक्षनेतृत्वाची भेट घेणार आहेत. निरानी हे येडियुरप्पांप्रमाणेच लिंगायत समाजाचे आहेत. त्यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले जाऊ शकते, तसेच भाजपचे सरचिटणीस सी.टी.रवी, गृहमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचीही नावे आघाडीवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
I have decided to resign. I will meet the Governor after lunch: Karnataka CM BS Yediyurappa at a programme to mark the celebration of 2 years of his govt pic.twitter.com/sOn0lXAfeD
— ANI (@ANI) July 26, 2021
दरम्यान, येडियुरप्पा हे नाट्यमय पद्धतीनेच मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते. २३ जुलै २०१९ ला कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं होतं आणि भाजपचं सरकार राज्यात आलं होतं. मात्र, यानंतर येडियुरप्पांच्या विरोधात सातत्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी उघड बंड पुकारले गेले आणि आज त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. “जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही,” असं येडियुरप्पा म्हणाले.
आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
दुसरीकडे, येडियुरप्पांनी पायउतार होण्याआधी पक्षासमोर ३ अटी ठेवल्याचं बोललं जातं असून, यात एका मुलाला केंद्रात, तर दुसऱ्याला राज्यात मंत्रिपद आणि पुढील मुख्यमंत्री आपल्याच मर्जीतील अशा तीन अटी येडियुरप्पांनी राष्ट्रीय नेतृत्त्वासमोर ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे भाजप लिंगायत समाजाचा मुख्यमंत्री देऊन मते राखणार; की येत्या काळात भाजपला इथे मोठ्या खांदेपालटाचा सामना करावा लागणार? हे काहीच दिवसांत कळवून येईल.
Read Also :
- हर्षवर्धन पाटलांचा कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम’? भरणेंचा मोठा गौप्यस्फोट
- भास्कर जाधवांना एवढा कशाचा माज? मुख्यमंत्र्यांसमोर महिलांबरोबर गैरवर्तणूक आणि अरेरावी
- राज्याला मुख्यमंत्रीही नाही आणि प्रशासनही नाही, राणेंची बोचरी टीका
- माझ्या जनतेवर दुःखाचा डोंगर, जन्मदिन साजरा करू नका; वाढदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन
- परळीत पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त मुंडे समर्थकांची बॅनरबाजी, मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब