मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा आणि अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी, गेल्या ३ दिवसांपासून मुख्यमंत्री, तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी केली. यांनतर आज मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर आपत्कालिन आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महत्त्वाचे काही मंत्री, राज्याचे मुख्य सचिव आणि आपत्कालिन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
फडणवीसांचे भास्कर जाधवांना शालीतून जोडे, तर महाविकास सरकारला मोलाचा सल्ला
या बैठकीत, राज्यात दरवर्षी उद्भवणारी पूर परिस्थिती लक्षात घेता, ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे, त्याठिकाणी संरक्षण भिंत उभारणार असल्याची चर्चा झाली असून, याबाबतीत राज्य सरकार मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड, ठाणे आणि पालघर या ५ जिल्ह्यांत भिंती उभारण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांचे एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देणार – अजित पवार
एकीकडून पुराचे पाणी आणि दुसरीकडून समुद्राचे पाणी, यामुळे समुद्रकिनारी असेल्या गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. समुद्राचे पाणी गावांत शिरून, शेत जमिनी समुद्राच्या पाण्याने खराब होतात. या घटना घडू नयेत, यासाठी ही संरक्षण भिंत बांधली जाणार असून, ५ जिल्ह्यांच्या काही भागांत जवळपास १७१ कि.मी. संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. यासाठी अंदाजे १६०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.
खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द! मात्र ‘पुन्हा येईन’चे दिले आश्वासन
दरम्यान, कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रायगडमध्ये अतिवृष्टीने हाहा:कार उडाला आहे. यामुळे आत्तापर्यंत १६४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० जण अजूनही बेपत्ता आहेत. ९०,००० जणांचे स्थलांतर केले गेले असून, निसर्गाच्या या प्रकोपात तब्बल २५ हजार ५६४ जनावरं दगावली आहेत. मदत व पुनर्वसन विभागाने ही अद्ययावत माहिती प्रसिद्ध केली आहे.
राज ठाकरेंच्या ‘त्या’ क्लीप्सनी, राज्यात नवीन राजकीय समीकरणाची शक्यता?
मुख्यमंत्र्यांनी सलग ३ दिवस पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर आज मुख्यमंत्री साताऱ्यातील कोयनानगरला आणि पाटणला जाणार होते, मात्र मुसळधार पाऊस आणि दृश्यमानता कमी असल्याने हेलिकॉप्टर लँड होऊ शकत नाही, असे सांगण्यात आले आणि मुख्यमंत्री विशेष विमानाने मुंबईला परतले. त्यानंतर त्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर ही आपत्कालिन बैठक आयोजित केली होती.
Read Also :
- “राज ठाकरेंचा मलाही फोन”, भाजपच्या बड्या नेत्याचा खुलासा; राज-भाजप भेटीची तारीख ठरली?
- राज्यातल्या भाजपच्या “या” मोठ्या नेत्याचा, झारखंड सरकार पाडण्याच्या कटात हात!
- “कुठेही गेलं तर जनतेचं ऐकून घ्यायचं असतं”, राष्ट्रवादीकडून शिवसेनेला घरचा आहेर
- ‘त्या’ प्रकरणावर मुख्यमंत्री बोलले, भास्कर जाधवांना दिला कानमंत्र
- सातव कुटुंबियांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण, राहुल गांधींची भेट घेऊन केला आनंद द्विगुणित