मुंबई : महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर केंद्रातील भाजपने आघाडीतील काही नेत्यांवर इडीचा ससेमीरा पाठीमागे लावला. याकाळात अनेक नेते तुरूंगात जाऊन आलेत. तर काही नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगातच शिक्षा भोगत आहेत. राज्यात नव्हे तर संपुर्ण देशात ज्या ठिकाणी भाजपची सत्ता नाही, तेथील सत्ताधारी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील लोकांना सुट्टीचे आदेश..! अजित पवार म्हणाले, मी तर…
त्या म्हणाल्या की, आम्ही सरकारमध्ये असूनही कधीही हिटलरशाही केली नाही, यंत्रणेचा गैरवापर केला नाही, तुम्ही सत्तेत आल्यावरही हिटलरशाही, यंत्रणेचा गैरवापर, माज, मस्ती दाखवणार असणार तर आमची वेळ येणारच आहे. मग चुन चुन के मारायचे का? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. तसेच सत्तेवर कायम कोणी नसते बंर का? जे पेरणार तेच उगवणार लक्षात ठेवा. अशा सज्जड दमही रूपाली पाटलांनी दिला आहे.
“मला तळमळतंय, जळजळतंय, तेवढी जाहीरात फक्त पाहून घ्या..!” भाजपचा सुळेंना टोला
आर्थिक भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक सध्या तुरूंगात आहेत. तर राष्ट्रवादीच्या अशा अनेक नेत्यांवर इडीचा ससेमिरा लागला आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना देखील न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. यातच भाजप विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
Read also
- पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योगांना राज्य सरकारचे ‘‘रेड कार्पेट’’..! मुंबईतील मॅरेथॉन बैठकीत प्रलंबित प्रश्नांना गती
- आम आदमी पार्टीचा खेडमध्ये ‘‘युवा संवाद’’..! खेड- आळंदी विधानसभा मतदार संघातील प्रश्नांवर होणार चर्चा
- “जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये”; जयंत पाटील
- आदित्य ठाकरेंनी घेतली तेजस्वी यादवांची भेट…! राजकीय वर्तुळात चर्चा
- “निवडणुका जिंकण्यासाठी मैदानात उतरू, तयारीला लागा”; उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आदेश