पुणे : येत्या महिन्यात गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी पुढच्या महिन्यात म्हणजे 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील गुजरात सीमेवरील जिल्ह्यातील नोकरदारांना पगारी सुट्टी देण्यात आली आहे. त्यावरून शिवसेनेने यावर प्रश्न उपस्थित केले आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
पहिले आमदार, नंतर प्रकल्प अन् आता मंत्रिमंडळ गुजरातला पाठवले..! आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
शेजाराच्या राज्यात निवडणुका असल्याने आपल्या राज्यातील जिल्ह्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आमचं सरकार असताना मध्यंतरी गोवा, मध्यप्रदेश तसेच कर्नाटक राज्यात विधान सभेची निवडणुक झाली. मग त्या भागातील लोकांना सुट्टी दिल्या गेल्या असलं कधी घडलं नाही. देशातील निवडणुक असेल तर लोकांना सुट्ट्या देणं हे समजू शकतो. परंतु परराज्यात निवडणुका असताना आपल्या जिल्ह्यातील लोकांना सुट्टी हे काही मला समजत नाही. अशी खोचक टिप्पणी अजित पवार यांनी लगावली. तसेच अशा प्रकारचे आदेश पहिल्यांदाच काढलेले दिसत आहेत. असंही अजित पवार यांनी सांगितले.
तीच गर्दी, तोच उत्साह…! ‘भारत जोडो यात्रे’चा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात प्रवेश…
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना अधिकार बजावता येईल यासाठी महाराष्ट्रातील नोकरदारांना सुट्टी देण्यात आली आहे. गुजरात सीमेवर असलेल्या नाशिक, नंदूरबार, पालघर आणि धुळे या जिल्ह्यातील नोकरदारांना पगारी सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये ऊर्जा, उद्योग, कामगार विभागांतर्गत येणारे सर्व उद्योगसमुह, महामंडळं, कंपन्या, तसेच संस्था तसेच औद्योगिक आस्थापने तसेच उपक्रम व इतर आस्थापने या क्षेत्रातील नोकरदारांना आदेश देण्यात आला आहे.
पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत भाजप यशस्वी..! तब्बल 9 जागांवर मिळवला ताबा
तसेच अपवादात्मक परिस्थितीमध्ये कामगार अधिकारी, कर्मचारी पुर्णदिवस सुट्टी शक्य नसेल तर मतदारसंघातल्या कामगारांना कमीत कमी दोन तासांची तरी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देण्यात यावी. असे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. तर गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी का? असा सवाल शिवसेनेच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी केला आहे.
Read also
- “मला तळमळतंय, जळजळतंय, तेवढी जाहीरात फक्त पाहून घ्या..!” भाजपचा सुळेंना टोला
- “थंड पडलेलं सरकार जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले…”राष्ट्रवादीचा खोचक टोला
- सुप्रिया सुळेंनी फडणवीसांचे दोन व्हिडीओ केले ट्विट..! म्हणाल्या, “विरोधात असताना अन् सत्तेत”
- “जीव धोक्यात असतानाही सरकारने माझी सुरक्षा काढली, सरकार माझ्या जीवाशी खेळतंय”; संजय राऊत
- “गुजरात प्रकल्प पळवतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय, अन् तरीही सरकार शांत”