पुणे : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली तालुक्यातील 40 गावांवर दावा सांगितला आहे. तसेच यावर कर्नाटक राज्य गांभीर्यांन विचार कत असल्याचं बोम्मई यांनी सांगितले आहे. यावरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार इतकं ढिलं झालं का? असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे.
पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत भाजप यशस्वी..! तब्बल 9 जागांवर मिळवला ताबा
आधी प्रकल्प गेले आता गावंही राज्यातून बाहेर जातील असा दावा परराज्याचे मुख्यमंत्री करू लागले. राज्याचा कारभार सुरळित चालण्यासाठी राज्यात सरकार स्थापन करण्यात येते. मात्र महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेले शिंदे-फडणवस सरकार या सुरळीत कारभाराला अपवाद ठरत आहे. त्यांची कृती आणि ढिसाळ कारभार या दाव्याकरीता अचूक आहे असे म्हणणे होणार नाही. असंही राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
“आंबेडकरवादी सुषमा अंधारेंनी बाळासाहेबांचे प्रखर हिंदूत्व स्वीकारलं का ?” शिंदे गटातील आमदाराचा सवाल
महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नावर मध्यस्थी करण्यासाठी पंतप्रधान पुढे सरसावले असतानाही सांगलीच्या जत तालुक्यातील तब्बल 40 गावं कर्नाटक राज्यात येणार असल्याचा दावा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला. यातूून शिंदे-फडणवीस यांनी केलेल्या अगणित दिल्ली वाऱ्या पुर्णपणे निष्फळ ठरून केंद्रात त्यांचे किती वजन आहे ते दिसून आले. महाराष्ट्रातील 40 गावं कर्नाटकमध्ये घेऊन जाण्याची कट परराज्यातील मुख्यमंत्री रचतात यातून शिंदे-फडणवीस सरकारच्या ढिसाळ आणि भोंगळ कारभाराची पुन्हा एकदा प्रचिती आली. यापुर्वीदेखील महाराष्ट्रातील प्रकल्प परराज्यात जाताना थंड पडलेलं सरकार जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे या सरकारकडून जनहीताची अपेक्षा करणे चुकीचे ठरू शकेल. असा टोलाही लगावला.
Read also
- सुप्रिया सुळेंनी फडणवीसांचे दोन व्हिडीओ केले ट्विट..! म्हणाल्या, “विरोधात असताना अन् सत्तेत”
- “जीव धोक्यात असतानाही सरकारने माझी सुरक्षा काढली, सरकार माझ्या जीवाशी खेळतंय”; संजय राऊत
- “गुजरात प्रकल्प पळवतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय, अन् तरीही सरकार शांत”
- पहिले आमदार, नंतर प्रकल्प अन् आता मंत्रिमंडळ गुजरातला पाठवले..! आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
- तीच गर्दी, तोच उत्साह…! ‘भारत जोडो यात्रे’चा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात प्रवेश…