मुंबई : राज्यात वीज बील वसूलीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांचा विरोधात असताना वीज बिला बाबतची भूमिका असल्याचे व्हिडीओ त्यांनी ट्विट केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी विनंती सुळे यांनी केली आहे.
“आंबेडकरवादी सुषमा अंधारेंनी बाळासाहेबांचे प्रखर हिंदूत्व स्वीकारलं का ?” शिंदे गटातील आमदाराचा सवाल
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता असताना मध्यप्रदेश सरकारच्या कामाचं कौतुक केलं होतं. मध्यप्रदेश सरकारने त्यावेळी 650 कोटी रूपये देऊन शेतकऱ्यांची वीजेची बिल मंजूर माफ केली आहेत. महाराष्ट्रात मात्र रोज सावकारी पद्धतीने वीजेची बिलं वसुल केली जातात. महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांच्या वीजाचे पैसै हे महावितरण कंपन्यांना दिलं पाहिजे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
महापालिकांच्या निवडणुकांचा बिगूल लवकरच वाजणार…! प्रभाग रचनेचा आयुक्तांना आदेश
त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वीजबिलासंदर्भात सक्तीची वसूल न करता, त्यांच्याकडून नंतर बीज बील घ्या, असं म्हणत शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नका. असे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यावर सुळे म्हणाल्या की, विरोधात असताना तत्कालिन विरोधी पक्षनेते व विद्यामान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश पॅटर्नचे कौतुक करीत वीजबिल वसुलीला विरोध केला होता. आता ते सत्तेत आहेत. त्यांच्याकडे अर्थखाते देखील आहे. त्यांनी आता मध्यप्रदेश पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
“येणाऱ्या काळात या सरकारला जनता घालवल्याशिवाय राहणार नाही”
दरम्यान, सुळे यांच्या मागणीवर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामेच करायचे नाही, केले तर सात-आठ महिने जीआर काढायचे नाही, जीआर काढले तर मदत वाटायचीच नाही, अशा थाटात चाललेल्या आपल्या सरकारची आठवण इतक्या लवकर विस्मृतीत गेली? असा सवाल भाजपने केला आहे. तसेच 4 महिन्यांचे सरकार 7000 कोटींहून अधिकची मदत शेतकऱ्यांना देतेच कशी, यावरून मला तळमळतंय. मला जळजळतंय अशी तुमची अवस्शा होणे साहजिकच आहे. शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न असो की सिंचनाचे हे सरकार निश्चितच सोडवेल. काळजी नसावी. तुमच्या अवस्थेवर औषध असलेली तेवढी जाहीरात फक्त पाहून घ्या. असा टोलाही भाजपने सुळे यांना लगावला.
4 महिन्यांचे सरकार 7000 कोटींहून अधिकची मदत शेतकर्यांना देतेच कशी, यावरुन ‘मला तळमळतंय्, मला जळजळतंय्’, अशी तुमची अवस्था होणे साहजिक आहे. शेतकर्यांचे विजेचे प्रश्न असो की सिंचनाचे हे सरकार निश्चितच सोडवेल. काळजी नसावी. तुमच्या अवस्थेवर औषध असलेली तेवढी जाहिरात फक्त पाहून घ्या! https://t.co/U0svwqHO9B
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 23, 2022
Read also
- “जीव धोक्यात असतानाही सरकारने माझी सुरक्षा काढली, सरकार माझ्या जीवाशी खेळतंय”; संजय राऊत
- “गुजरात प्रकल्प पळवतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय, अन् तरीही सरकार शांत”
- पहिले आमदार, नंतर प्रकल्प अन् आता मंत्रिमंडळ गुजरातला पाठवले..! आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
- तीच गर्दी, तोच उत्साह…! ‘भारत जोडो यात्रे’चा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात प्रवेश…
- पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत भाजप यशस्वी..! तब्बल 9 जागांवर मिळवला ताबा