मुंबई : बेकायदेशीय सरकारमधील मंत्री महिलांना अपशब्द, छत्रपती शिवरायांचा अपमान करतात. अशा मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करत नाही. राज्यपालांचा साधा निषेधही करत नाही. सरकारचे हे कृत्य महाराष्ट्राची जनता पाहत असून येणाऱ्या काळात या सरकारला जनता घालवल्याशिवाय राहणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी दिली आहे.
“सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली, काय होईल सांगता येत नाही”; दानवेंचं सुचक वक्तव्य
सिल्लोड येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याची घटना घडली होती. खोक्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी सुळेंवर टिका करताना जीभ घसरली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. मात्र अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांची जाहीर माफि मागितली अन् प्रकरण शांत झालं.
“कुणाची बायोपिक बघायला आवडेल?” राज ठाकरे म्हणाले की, “या देशात फक्त एकच..”
त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यातच भाजपचे प्रवक्ते असलेले सुधांशू त्रिवेदी यांनी देखील शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यातील जवळपास सगळ्याच नेत्यांनी यांचा जाहीर निषेध केला. तसेच राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा. अशी भूमिका देखील राजकीय नेत्यांनी घेतली.
“राणेंच्या घरावर कारवाई झाली, तिकडे सोमय्या हातोडा घेऊन का जात नाही”
दरम्यान, मागील राजकीय वातावरण या ना त्या मुद्द्यांवरून चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याचं विस्तार अजूनही झालेला नाही. त्यामुळे या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार ते पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर शिंदे सोबत गेलेल्या 40 आमदार मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे पुढे काय राजकीय घडामोडी घडणार त्याकडे लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- “राहुल गांधींचा महाराष्ट्रातील जनतेसाठी खास संदेश”; म्हणाले, ‘या भूमीत…’
- “हा मला मुख्यमंत्र्यांनी 900 खोके दिलेत”; बंडखोर आमदार प्रताप सरनाईक
- गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना सुट्टी..! सुट्टी का ? सेनेचा सवाल
- ‘टिकली’ प्रकरणावर भिडेंनी महिला आयोगाकडे मागितला 10 दिवसांचा वेळ
- “शिंदे सरकारच्या विसर्जनाची घंटा रावसाहेब दानवेंनी वाजवली”