मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर 50 खोक्यांचा सातत्याने आरोप करण्यात आला. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विरोधकांनी बंडखोर आमदारांना यावरून सातत्याने डिवचलं. यातच मला 900 कोटीचा रूपयाचा खोका देण्यात आला. परंतु माझ्या मतदार संघातील विकासकामांना मुख्यमंत्र्यांचं आभार मानतो. असं शिंदे गटाचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
“राणेंच्या घरावर कारवाई झाली, तिकडे सोमय्या हातोडा घेऊन का जात नाही”
प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सक्षम त्यांनी ठाणे महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी 1800 कोटी रूपयांचा निधी देऊ केला आहे.त्यापैकी 900 कोटीचा निधी हा ओवळा-माजिवाडा मतदार संघातील विकास कामांसाठी आहे तर उर्वरित 900 कोटींचा निधी मतदार संघ वगळून महापालिका क्षेत्रातील भागांसाठी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“मालक, निदान एक लाखाचा आकडा तरी पुर्ण करा”; राष्ट्रवादीने मोदींना डिवचलं
या निधीमुळे रस्ते, सुशोभिकरण तसेच इतर नागरी कामे होणार आहेत, यापुर्वी आम्हाला निधी मागावा लागायचा पण, आता समोरूनच निधी मिळतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सक्षम आहे. त्यामुळे आमदारांनी पत्रे देण्यापुर्वीच मुख्यमंत्री शिंदे ह विकासाकामांसाठी निधी देत आहेत. असंही म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांनी टोला लगावला.
Read also
- गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना सुट्टी..! सुट्टी का ? सेनेचा सवाल
- ‘टिकली’ प्रकरणावर भिडेंनी महिला आयोगाकडे मागितला 10 दिवसांचा वेळ
- “शिंदे सरकारच्या विसर्जनाची घंटा रावसाहेब दानवेंनी वाजवली”
- “सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली, काय होईल सांगता येत नाही”; दानवेंचं सुचक वक्तव्य
- “कुणाची बायोपिक बघायला आवडेल?” राज ठाकरे म्हणाले की, “या देशात फक्त एकच..”