मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनामध्ये विविध मुद्यांवरून जोरदार खडांंजगी बघायला मिळत आहेत. यातच केंद्रीय राज्य मंत्री आणि भाजप नेते रावसाहेव दानवे यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती सध्या चांगली नसल्याचं म्हटलं आहे. त्यावर पुढील काही महिन्यात सरकार पडणार असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
“हे सरकार 100 टक्के पडतंय, माझ्याकडे पुर्ण माहिती अन् खात्री”; संजय राऊतांचं सुचक वक्तव्य
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथील एका प्रकल्पाच्या उद्धघाटनाप्रसंगी रावसाहेब दानवे यांनी महत्वपुर्ण भाष्य केलं आहे. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नसल्याचंही ते म्हणाले. तसेच सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा. असं देखील त्यांनी म्हटलंय.
“राज्यपालांच्या वक्तव्याचा सगळ्याच नेत्यांकडून निषेध..! भाजप नेते कुठंय?”
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी विचारले असता, त्यांनी असं म्हटलंय की, रावसाहेब दानवे कधी खरं बोलून दाखवतात. दोन महिन्यानंतर काहीही होऊ शकतं. म्हणजे सरकार पडू शकतं म्हणजेच त्यांनी मध्यवर्तीचे संकेत दिले आहेत. हे सरकार 100 टक्के पडतंय, याविषयी माझ्याकडे पुर्ण माहिती आणि खात्री असल्याचा दावा देखील राऊतांनी केला आहे.
“प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणुस ;” शिंदे गटाच्या आमदाराचं सुळेंकडून कौतुक
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बऱ्याच दिवसांनी 20 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्र्यांचा शपथ विधी अद्यापही झाला नाही. त्याचबरोबर शिंदेंसोबत गेलेले 40 आमदारांना पैकी अनेकांना मंत्रीपद हवं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये 10 अपक्ष आमदारांचा देखील सहभाग असल्याने मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ते काही सांगू शकत नाहीत. मात्र मंत्रिपद मिळाण्यासाठी अनेक आमदार आग्रही आहेत. त्यामुळे आगामी काही काळात काय घडामोडी घडणार ते आता पाहणां महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “कुणाची बायोपिक बघायला आवडेल?” राज ठाकरे म्हणाले की, “या देशात फक्त एकच..”
- “राणेंच्या घरावर कारवाई झाली, तिकडे सोमय्या हातोडा घेऊन का जात नाही”
- “मालक, निदान एक लाखाचा आकडा तरी पुर्ण करा”; राष्ट्रवादीने मोदींना डिवचलं
- “हा गरीब बिचारा मारला जाईल अन् वरचे अधिकारी..” आव्हाडांचं त्या प्रकरणावर भाष्य
- “तर त्यांनी स्वत; च्या बुद्धीबाबत विचार करावा;” भाजपच्या प्रवक्त्यानी उलट विरोधकांना सुनावलं