पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात एकच नवा वाद निर्माण झाला. राज्यपालांच्या वक्तव्याचा राज्यातील राजकीय नेत्यांनी कडाडून निषेध व्यक्त केला. तसेच भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी संपुर्ण राज्यात जोरदार आंदोलने केलीत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे.
सलग 3 दिवस महाराष्ट्रात राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस, शिवसेना, शिंदे गट, मनसे यांनी राज्यपाल व भाजप प्रवक्ता त्रिवेदी विरूद्ध उग्र आंदोलन केले, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे कुठेही आंदोलन दिसले नाही. उलट दोघांनाही पाठीशी घातले ही घटना महाराष्ट्राने अधारेखित करावी. अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
“पाठराखण का करताहेत, कोश्यारींना तात्काळ महाराष्ट्राबाहेर काढा”; संभाजी राजे फडणवीसांवर संतापले
शिवाजी जुन्या काळातील आदर्श आहेत. असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीने पुण्यात डमी राज्यपाल उभं करून अनोखे आंदोलन केलं. तर मनसेनेही मुंबईत राज्यपालांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. यातच शिंदे गटातील आमदारांनी देखील राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. तर राज्यातील राजकीय संघटनांनी देखील राज्यपालांचा निषेध व्यक्त केला.
“शरीराचा भाग जसा कापून काढतो तसा त्रिवेदी अन् राज्यपालांना..”; उदयनराजे संतापले
दरम्यान, राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली. राज्यपालांच्या वक्तव्याच्या अर्थ वेगवेगळे काढण्यात आल्याचं फडणवीसांना सांगितले. त्यावरून देखील विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. तर छत्रपतींचे वंशज असलेल्या तिन्ही राजेंनी राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर हाकलून द्यावे. अशी मागणी केली.
Read also
- “प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणुस ;” शिंदे गटाच्या आमदाराचं सुळेंकडून कौतुक
- “लाखो नोकऱ्या, महागाईचा भडका, यालाही विपर्यास म्हणणार का?”रोहित पवारांचं फडणवीसांना सवाल
- आदित्य ठाकरेंचं वरळीकरांना भावनिक पत्र…! म्हणाले, “तुमचे आशीर्वाद अन् प्रेम मला…”
- “हिवाळी अधिवेशनापुर्वी राज्य मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता”?
- “राज्यपालांचं आक्षेपार्ह वक्तव्य हे दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर”