मुंबई : राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्या केल्याप्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर कडाडूून टिका केली जात आहे. आज पुण्यात राष्ट्रवादीच्या तर्फे राज्यपाल आणि त्रिवेदी यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार उदयनराजे यांनी देखील यांच्यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
“आमचे वैचारिक व्यासपीठ एकच, दोन्ही विचारांचे वारसे घेऊन चालतोय”; उद्धव ठाकरे
प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय स्वत: च्या समाजकार्याला, राजकीय वाटचालीला सुरूवात करत नाही. राज्यपालाच पद सन्मानाच पद आहे. त्यांना आपण काय बोलावं हे कळायला पाहिजे. त्यांनी एकदा नव्हे दोनदा विधान केलं. याकडे खासदार उदयन राजे यांनी लक्ष्य वेधले. त्यानंतर कुठला तो थर्डक्लास भिकारडा. असं म्हणत त्यांनी सुधांशु त्रिवेदी यांच्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
“हीच संवेदनशीलता एका नेत्याला लोकनेता बनवते”; अन् एका महिलेच्या खांद्यावरील बॅग राहुल गांधींनी घेतली
अशा लोकांनी शिवाजी महाराजांबद्दल काहीही बोलायचं? राज्यपाल असो किंवा त्रिवेदी या दोघांनीही माफी मागायला हवी. सर्वात आधी त्यांना पदावरून हाकला. अन्यथा माझी पुढची वाटचाल काय असेल हे मी त्यावेळी सांगेल, अशा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे. ही विकृती आहे. अशा विकृत लोकांना पक्षातून काढणं गरजेच आहे. आपल्या शरीराल गॅंगरीन झाल्यावर आपण शरीराचा भाग जसा कापून काढतो. तसा त्रिवेदी आणि राज्यपालांना फेकून दिलं पाहिजे. अशी जहरी टिकाही राजे यांनी केली.
या 8 प्रश्नाचं उत्तर देईल का खोके सरकार ? आदित्य ठाकरे यांचे शिंदेंना सवाल
दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यात अनेक वाद निर्माण झाले आहेत. राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यपालांच्या विरोधात राज्यातील अनेक नेत्यांनी कडाडून टिका केली आहे. तसेच आज पुण्यात राष्ट्रवादीने राज्यापालांविरोधात आंदोलने केली आहेत. तर शिवसेनेने मुंबईत राज्यपालांचे नाव असलेले खोके समु्द्रात फेकून अनोखे आंदोलन केले.
Read also
- ‘टिकली’ वर टिका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का ? चित्रा वाघ यांचा सवाल
- “महाराजांवर दुसरं कोणी बोललं असतं तर भाजपने थयथयाट केला असता”; संजय राऊत
- चॅनेलमधील मुली पत्रकार साडी का घालत नाहीत..? सुप्रिया सुळेंचा अजब सवाल
- “आम्ही आयुष्याचा सट्टा खेळून भाजपकडे आलो”; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
- “केंद्र सरकार चांगलं काम करतंय, मोदी माझे आवडते पंतप्रधान”; सुप्रिया सुळे