मुंबई : राज्यात वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू असल्याचं चित्र काही दिवसापासून सुरू आहे. मंत्री अब्दुल सत्तार, त्यानंतर संभाजी भिडे अन् आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आले आहे. राज्यपालांच्या वक्तव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला हाणला आहे.
या 8 प्रश्नाचं उत्तर देईल का खोके सरकार ? आदित्य ठाकरे यांचे शिंदेंना सवाल
मराठवाडा विद्यापीठातील पदवी प्राधान संमेलन सोहळ्यात राज्यापालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यातील सर्व राजकीय नेत्यांनी राज्यपालांवर प्रखर शब्दात टिका केली. तसेच राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या विरोधात तीव्र आंदोलने देखील काढली. याच बरोबर भाजपचे प्रवक्त्यांनी देखील शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपला याचा मोठा सामाना करावा लागला.
“कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा”; महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर मनसेही आक्रमक
राज्यपालांच्या बोलण्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने काढला गेला असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. त्यानंतर राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे आम्हाला समर्थन करता आले असते. मात्र आम्ही तसे केले नाही. राहुल गांधी यांचा बचाव केलेला नाही. हाच आमच्यात आणि भाजपात फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर दुसरं कोणी काही बोललं असतं तर भाजपने थयथयाट केला असता. असा खोचक टोलाही राऊतांनी हाणला.
“राज्यपालांच्या वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्या बुद्धीवर होताना दिसतोय”; काॅंग्रेसची जहरी टिका
दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले की, आज तुमचे राज्यपाल, तुमचे प्रवक्ते शिवरायांचा अवमान करणारी वक्तव्ये करत आहेत. हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे. तरदेखील त्यांचा बचाव करत आहात. म्हणजेच तुमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रासंदर्भात त्यांचे प्रेम खरे नाही. अशी टिका देखील संजय राऊतांनी भाजपवर केली आहे.
Read also
- चॅनेलमधील मुली पत्रकार साडी का घालत नाहीत..? सुप्रिया सुळेंचा अजब सवाल
- “आम्ही आयुष्याचा सट्टा खेळून भाजपकडे आलो”; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
- “केंद्र सरकार चांगलं काम करतंय, मोदी माझे आवडते पंतप्रधान”; सुप्रिया सुळे
- “आमचे वैचारिक व्यासपीठ एकच, दोन्ही विचारांचे वारसे घेऊन चालतोय”; उद्धव ठाकरे
- “हीच संवेदनशीलता एका नेत्याला लोकनेता बनवते”; अन् एका महिलेच्या खांद्यावरील बॅग राहुल गांधींनी घेतली