मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यामध्ये बंडानंतर सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचारावरून उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहेत. यावर आता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना आठ सवाल केले आहेत.
“सावरकरांचे नाव सोयीनुसार वापरून राजकरण करण्याचा भाजपचा डाव”; सुषमा अंधारे
आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतील पाच हजार कोटींच्या रस्त्यांच्या निविदांसाठी कुणीच पुढे आले नाही की, तुमचे कोणी पुढे आले नाही? तसेच मुंबईत आम्ही हाती घेतलेली अनेक कामे खोके सरकारने थांबवली. हे मुंबईचे खच्चीकरण असून हे नेमकं कुणासाठी चाललंय? यामागील नेमका सूत्रधार कोण? याचे उत्तर देऊ शकाल? मुंबई महापालिकेमध्ये महापौर नसताना एवढी उधळपट्टी कोणाच्या आदेशावरून होत आहे? ही कुणाची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे.
“नारायण राणेंचं विधान म्हणजे चिंटूचे जोक”; राणेंचा तो दावा गोऱ्हेंनी फेटाळला
त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचा निधी मिंधे गटाच्या वाढीसाठी वापरला जातोय का? याचे उत्तर आहे का तुमच्याकडे? तसेच रस्त्यांसाठी काढलेली टेंडर्स रद्द होत आहेत. चांगल्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या जात आहेत. इतका गडबड गोंधळ कोणाच्या इशाऱ्यावरून चाललाय. नक्की हे सरकार कोण चालवतंय? असाही सवाल त्यांनी केला आहे.
इडीच्या अटकेत असलेल्या आपच्या नेत्याला VIP सेवा..! व्हिडीओ व्हायरल, भाजपचा निशाणा
तसेच मुंबई महापालिकेचा कारभार गेली २५ वर्षे शिवसेना पारदर्शकपणे चालवत आहे. आता प्रशासक बसल्यावर व खोके सरकार आल्यावर ही पारदर्शकता का दिसत नाही? ४ मंदिरांच्या कामावर, किल्ल्यांच्या कामावर, ” स्मारकाच्या कामावर स्थगिती आली आहे. हे खोके सरकारचे हिंदुत्व आहे का? ८ मुंबई महापालिकेच्या ११ सीबीएसई आणि एका आयसीएसई शाळेसाठी लागणारी राज्य सरकारची एनओसी अजून का दिली नाही? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी केले आहेत.
Read also
- “कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा”; महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर मनसेही आक्रमक
- “राज्यपालांच्या वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्या बुद्धीवर होताना दिसतोय”; काॅंग्रेसची जहरी टिका
- “मराठवाडा विद्यापीठासाठी आंबेडकर अन् यशवंत चव्हाणांचं मोठं योगदान”; शरद पवार
- राज्यपालांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले की,”शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श…”;
- “गुजरातच्या धर्तीवर उतरली भाजपच्या मुख्यमंत्र्यांची फौज”; निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला