मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अन् विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता निलम गोऱ्हे देखील शिंदे गटात जाणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यावर निलम गोऱ्हे यांनी यावर स्पष्टिकरण दिलं आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
“आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज रहा ;” राष्ट्रवादी तयारीला लागली
काल रात्री मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये निलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली. मात्र मी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटण्यासाठी गेले असल्याचं गोऱ्हेंनी सांगितलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्याशी कोणतेही चर्चा झाली नाही. फक्त त्यांची त्याठिकाणी उपस्थिती हा केवळ योगायोग होता असंही त्या म्हणाल्या.
“विरोध करणाऱ्यांनी विरोध करावा, भारत जोडो यात्रा अखंड सुरू राहणार”
त्याआधी नारायण राणे यांनी निलम गोऱ्हे यांच्याबद्दल एक महत्वाचं भाष्य केलं होतं. नीलम गोऱ्हे शिवसेनेत नाराज होत्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांंच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे त्या शिवसेना सोडून चालल्या होत्या. माझ्या शिफारशीमुळे त्या थांबल्या. असा गोप्यस्फोट नारायण राणेंनी केला. त्यावर नारायण राणेंच्या वक्तव्याला काहीही अर्थ नसल्याचं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
“भारत जोडो यात्रा थांबवून राहुल गांधींना अटक करा”; नेत्यांची धरपकड केल्याने मनसे आक्रमक
दरम्यान, मला वाटतं चिंटूचे जोक असे जे विनोद असतात तसा हा प्रकार आहे. त्यामुळे राणेचं विधान फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. नारायण राणे आणि माझं मागील पाच ते सहा वर्षांमध्ये कधी बोलणंही झालं नाही. ते 2015-2016 च्या सुमाराला विधानपरिषदेचे सदस्य होते. त्यावेळेला बोलताना आम्ही केवळ जय महाराष्ट्र किंवा नमस्कार वगैरे बोलायचो. असंहीत्या म्हणाल्या.
Read also
- इडीच्या अटकेत असलेल्या आपच्या नेत्याला VIP सेवा..! व्हिडीओ व्हायरल, भाजपचा निशाणा
- “आम्ही म्हणू श्री हरी, तुम्ही करा मोदी मोदी”; अन् भाजप नेत्याला राष्ट्रवादीच्या नेत्यानं डिवचलं
- “देशासाठी ज्यांनी त्याग केलाय, त्यांच्याविषयी कुणीही चिखलफेक करू नये”; संजय राऊत
- “शरद साखर कारखान्यात मोठा भ्रष्टाचार, पुराव्यासकट बाहेर काढणार”; दानवेंचा संदीपान भूमरेंना इशारा
- राहुल गांधींच्या सभेसाठी लाखोंची गर्दी..! मात्र वीर सावरकरांबाबत बोलण्याचं टाळलं