मुंबई : राहुल गांधी यांनी स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेगाव याठिकाणी होणाऱ्या सभेला विरोध करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत बॉम्बने उडवून देऊ..!” धमकीच्या पत्राने खळबळ
भारत जोडो यात्रेला कोणी विरोध करत असेल तर ती त्यांची विचारधारा आहे. या देशाला एकसंघ ठेवणं ही काॅंग्रेसची विचारधारा आहे. एकता व एकात्मतेच्या आधारावर एकत्र करणं आवश्यक आहे. सर्वांना एकत्रित करणं त्यांना न्याय देणं गरजेचं आहे. सामाजिक न्यायासाठी भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांनी सुरू केली आहे. विरोध करणाऱ्यांनी विरोध करावा. आमची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर अखंड राहणार आहे. लोकं आमच्याशी जुळताहेत. असंही राऊत म्हणाले.
“आम्हाला जर काळे झेंडे दाखवले तर आम्ही त्यांना गुलाबाचं फुल देऊ”
दरम्यान, मनसेच्या नेत्यांची धरपकड गेल्याने राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. पोलीस यंत्रणा मनसे नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड का करत आहे. ?असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल चुकीचे विधान करणारे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा थांबवून त्यांना अटक करा. कायम महाराष्ट्र व राज्याच्या अस्मिता, प्रतीक याबद्दल आकस असणाऱ्या काॅंग्रेसवाल्यांचा माज उतरवलाच पाहिजे. अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली आहे.
Read also
- “भारत जोडो यात्रा थांबवून राहुल गांधींना अटक करा”; नेत्यांची धरपकड केल्याने मनसे आक्रमक
- काळे झेंडे दाखवण्यासाठी आलेल्या मनसेच्या नेत्यांची धरपकड..! चिखलीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त
- “राहुल गांधींची भारत जोडो नाहीतर मोदी विरोधी जोडो यात्रा”; फडणवीसांचा गुजरातमध्ये हल्लाबोल
- “संजय राठोड विषय निघताच चित्रा वाघ भडकल्या”; म्हणाल्या, “तर मी ही चित्रा वाघ आहे, लक्षात ठेवा”
- “सावरकरांच्या नाही तर देश गांधींच्याच विचाराने पुढे चालवा”; काॅंग्रेसचं संजय राऊतांना प्रत्युत्तर