बुलढाणा : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर कडाडून टिका केली आहे. तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर मनसे देखील आक्रमक झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना भारत जोडो यात्रेला काळे झेंडें दाखवण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“राहुल गांधींच्या वक्तव्याने देशातील काँग्रेसचा जनाधार संपला”
राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत एक पत्र दाखवलं. ते त्यांनी वाचावं. कारण ही यात्रा विचारांची आहे. केंद्रातील भाजपवर लोकांचा रोष आपण पाहत आलो आहे. लोकांची असंख्य गर्दी भारत जोडो यात्रेत येत आहे. ही यात्रा आता जनतेची झाली आहे. ज्यांना विरोध करायचा असेल त्यांनी करावं. तसेच त्यांनी जर आम्हाला काळे झेंडे दाखवले तर आम्ही त्यांना गुलाबाचं फुल देऊ. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा विदर्भातील चौथा दिवस असून ते आज अकोल्यातल्या कुपट बाळापुर येथून सकाळी यात्रेला सुरूवात केली. आज ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या यात्रेचं वरखेड येथे स्वागत केलं जाणार आहे. तसेच राहुल गांधी दुपारी शेगावात गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे.
“स्वांतत्र्य लढ्यात योगदान नसलेल्या मातृसंस्थांच्या पिल्लांनी सावरकरांबाबत बोलू नये”
दरम्यान, आज सांयकाळी शेगाव येथे राहुल गांधी यांची विराट सभा होणार आहे. या सभेत जवळपास 8 लाख लोकांची गर्दी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तब्बल 25 एकर परिसरात या सभेचं नियोजन करण्यात आलं आहे. सावरकरांच्या वक्तव्यानंतर आज राहुल गांधी सभेत काय बोलणार ते आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “अशाने महाविकास आघाडीत फुटही पडू शकते”; राऊतांचं सुचक वक्तव्य
- “जयंत पाटील हा राज्यातला बिनडोक नेता”; गोपीचंद पडळकरांची जहरी टिका
- “भारत जोडो यात्रा तुम्ही रोखून दाखवा..!” राहुल गांधींचं भाजपला आवाहन
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला