मुंबई : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबतच्या वक्तव्यावरून भाजपनेते कडाडून टिका करीत आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून आता भाजप उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्याला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सावरकारांबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. परंतु ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता. अशा मातृसंस्थांच्या पिल्लांनी आम्हाला प्रश्न विचारता कामा नये. असं म्हणत ठाकरेंनी भाजपला फटकारलं.
आव्हाडांच्या पत्नीची महिला आयोगाकडे धाव..! म्हणाल्या, “त्या महिलेवर कायदेशीर करा”
संघ स्वांतत्र्य लढ्यात नव्हता. संघाला आता 100 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय आहे? हे आधी सांगा. बाष्काळपणा बंद करा. आपल्या मातृसंस्थेचा स्वातंत्र्य लढ्यात भाग नव्हता त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये. निजामांच्या काळात हिंदूंवर अत्याचार होत होते. त्यावेळी तुमची मातृसंस्था कुठे होती? त्यांनी हिंदूंवरील किती अत्याचार थांबवले? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय.
“भारत जोडो यात्रा मानवतेचा सागर, राहुल गांधी थकतच नाही,”; प्रणिती शिंदे
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील भाष्य केलंय. पंतप्रधानांकडे भारतरत्न देण्याचे अधिकार असतात. मग गेली 8 वर्ष सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? राहुल गांधी यांच्या विधानाशी मी सहमत नाही. परंतु तुम्हाला देखील सावरकरांबाबत बोलण्याचा अधिकार नाही. असंही ते म्हणाले.
दरम्यान, आज शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दहावी स्मृतीदिन असून त्यांना राज्यातील अनेक नेत्यांनी आदरांजली वाहली. उद्धव ठाकरे यांनी देखील शिवाजी पार्कवर जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर ते बोलत होते.
Read also
- “खरं बोलण्यासाठी हिमंत लागते, अन् ती हिमंत राहुल गांधींकडे आहे”
- “सावरकर इंग्रजांकडून महिन्याला 60 रूपये पेन्शन घेत होते”; नाना पटोले यांचं वक्तव्य
- “महाराष्ट्रात काही ढोंगी लोक सध्या स्वत: ला बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणवून घेताहेत”
- “ज्यांना मंत्रिपद मिळणार नाहीत, ते दुसरी नवरी बघतील”; माजी मंत्र्यांचा खोचक टोला
- कुठं आहे महागाई? ४० हजार रुपयांचा मोबाईल आज 4 हजार रुपयांना मिळतोय