मुंबई : एकीकडे देशासाठी अवघ्या 24 व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत. ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काॅंग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. असं वक्तव्य काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत केलं. त्यावरून आता भाजपने त्यांच्यावर कडाडून टिका केली आहे. त्याला काॅंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकुर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राहुल गांधी यांनी जे काही बोललं आहेत ते इतिहास असून त्यांनी खरं सांगितले आहेत. तसेच खरं बोलण्यासाठी हिमंत लागते. जे लोक इतिहासाची तोडमोड करतात. त्यांनी निर्लज्जपणा सोडला पाहिजे. अन् जो इतिहास आहे, तो ते बोलले. तसेच राहुल गांधी कोणत्याही खऱ्या गोष्टीला बोलायला घाबरत नाहीत. तसेच सकाळी चार वाजल्यापासून संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत काम करीत असते. तसेच त्यांच्याकडे सातत्य असून भाजपकडे काही कारण नसल्याने ते बोलत आहेत. असंही ठाकूर यांनी म्हटलं आहे.
यावरून भाजपने राहुल गांधी यांच्यावर जहरी टिका केली आहे. महाराष्ट्रात येऊन राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात. त्यांच्या हातात हात घालून पेंग्विन सेनेचे युवराज चालतात. हे भारत जोडो नाही. भारत तोडो आहे. यात्रेचा चेहरा राहुल. तुष्टीकरणासाठई घुसखोर आदित्य अजेंडा तुकडे तुकडे गॅंगचा. सगळ ओके असलं तरी, आम्ही जनतेसमोर उघडे पाडणार असं भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.
“आम्ही ब्राम्हण आहोत, आम्हाला त्याचा गर्व”; अमृता फडणवीस
तर सावरकर यांनी इंग्रजांना पत्रव्यवहार करून माफी मागितली होती. इतकचं नाही तर सावरकर हे इंग्रजांकडून महिन्याला 60 रूपये पेन्शन देखील घेत होते. असं वक्तव्य काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्याचबरोबर भारत जोडो ही यात्रा देशाची यात्रा आहे. ही आता काॅंग्रेस पक्षाची यात्रा झालेली नाही तर सर्वसामान्यांच्या आकांक्षाचे प्रतिबिंब या त्यातून व्यक्त होत आहे. अशी यात्रा थांबविल्यास त्याचे काय परिमाण होतील ? याची चिंता त्यांनी करावी. असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Read also
- “महाराष्ट्रात काही ढोंगी लोक सध्या स्वत: ला बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणवून घेताहेत”
- “ज्यांना मंत्रिपद मिळणार नाहीत, ते दुसरी नवरी बघतील”; माजी मंत्र्यांचा खोचक टोला
- कुठं आहे महागाई? ४० हजार रुपयांचा मोबाईल आज 4 हजार रुपयांना मिळतोय
- आव्हाडांच्या पत्नीची महिला आयोगाकडे धाव..! म्हणाल्या, “त्या महिलेवर कायदेशीर करा”
- “भारत जोडो यात्रा मानवतेचा सागर, राहुल गांधी थकतच नाही,”; प्रणिती शिंदे