मुंबई : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबतच्या वक्तव्यावरून भाजपनेते कडाडून टिका करीत आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिले आहेत. तर भाजपच्या नेत्यांनी देखील कडाडून टिका केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश खत्री यांनी राहुल गांधी यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
“ज्यांना मंत्रिपद मिळणार नाहीत, ते दुसरी नवरी बघतील”; माजी मंत्र्यांचा खोचक टोला
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करून राहुल गांधी यांना पप्पू ही जनतेने दिलेली उपाधी किती योग्य आहे ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भारतमातेच्या थोर सुपुत्राचा आणि एका महापुरुषाचा राहुल गांधींनी अपमान पुन्हा एकदा केला आहे. ज्यांच्या पूर्वजांनी देशाची फाळणी केली ते राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहेत. प्रत्यक्षात या यात्रेतून देश तोडण्याची भाषा केली जाते. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पाहणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधाने केली जातात. असं गिरीश खत्री यांनी म्हटलं आहे.
कुठं आहे महागाई? ४० हजार रुपयांचा मोबाईल आज 4 हजार रुपयांना मिळतोय
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, सावरकर यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी राहुल गांधींनी भारतीय स्वातंत्र्य इतिहासाचा अभ्यास करावा. देशातील काँग्रेसचा जनाधार संपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वीर सावरकर यांचा हिंदुत्वाच्या विचाराचा भारतीय जनतेने स्वीकार केला आहे. त्यामुळे नैराश्यातून राहुल गांधी बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यांना देशात अराजकाची स्थिती निर्माण करायची आहे. आश्यर्य तर या गोष्टीचंही वाटतं कि सावरकरांचा सतत अपमान करणाऱ्या सोबत मा.बाळासाहेबांचे वारसदार फिरतात. उद्धव ठाकरेंचे मौन म्हणजे त्यांचीही या टीकेला मूकसंमती आहे असे समजावे का ? राहुल गांधींचा निषेध आणि त्यांच्या टीकेला मूकसंमती देणाऱ्या उद्धव ठाकरेंचाही निषेध.
Read also
- “शेगावला जा अन् राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा”; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश
- “स्वांतत्र्य लढ्यात योगदान नसलेल्या मातृसंस्थांच्या पिल्लांनी सावरकरांबाबत बोलू नये”
- “खरं बोलण्यासाठी हिमंत लागते, अन् ती हिमंत राहुल गांधींकडे आहे”
- “सावरकर इंग्रजांकडून महिन्याला 60 रूपये पेन्शन घेत होते”; नाना पटोले यांचं वक्तव्य
- “महाराष्ट्रात काही ढोंगी लोक सध्या स्वत: ला बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणवून घेताहेत”