बुलढाणा : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर कडाडून टिका केली आहे. तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर मनसे देखील आक्रमक झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना भारत जोडो यात्रेला काळे झेंडें दाखवण्याचे आदेश दिले आहेत.
कुठं आहे महागाई? ४० हजार रुपयांचा मोबाईल आज 4 हजार रुपयांना मिळतोय
इंग्रजांकडून सावकर पेन्शन घेत होते. तसेच त्यांनी लिहिलेल्या पत्रात मी तुमच्या शेवटपर्यंत नोकर म्हणून काम करेन, तसेच तुम्ही सांगितलेले काम करत राहिन असं सावकरांनी इंग्रजांना पत्र पाठवलेलं असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यावरून मनसेचे सगळ्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा येथे जमा व्हावे आणि शेगावला जा आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.
आव्हाडांच्या पत्नीची महिला आयोगाकडे धाव..! म्हणाल्या, “त्या महिलेवर कायदेशीर करा”
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांकडे भारतरत्न देण्याचे अधिकार असतात. मग गेली 8 वर्ष सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? राहुल गांधी यांच्या विधानाशी मी सहमत नाही. परंतु तुम्हाला देखील सावरकरांबाबत बोलण्याचा अधिकार नाही. असंही ते म्हणाले.
Read also
- “स्वांतत्र्य लढ्यात योगदान नसलेल्या मातृसंस्थांच्या पिल्लांनी सावरकरांबाबत बोलू नये”
- “खरं बोलण्यासाठी हिमंत लागते, अन् ती हिमंत राहुल गांधींकडे आहे”
- “सावरकर इंग्रजांकडून महिन्याला 60 रूपये पेन्शन घेत होते”; नाना पटोले यांचं वक्तव्य
- “महाराष्ट्रात काही ढोंगी लोक सध्या स्वत: ला बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणवून घेताहेत”
- “ज्यांना मंत्रिपद मिळणार नाहीत, ते दुसरी नवरी बघतील”; माजी मंत्र्यांचा खोचक टोला