अकोला : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत सुरू आहे. त्यांची यात्रा आज महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात आली आहे. याच दरम्यान राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याचे पडसाद संपुर्ण राज्यात उमटले असून शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी भारत जोडो यात्रा बंद करावी अशी मागणी केली आहे. त्यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“खरं बोलण्यासाठी हिमंत लागते, अन् ती हिमंत राहुल गांधींकडे आहे”
सावकरांनी त्याकाळी इंग्रजांना मदत केली होती. तसेच त्यांनी लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं होतं की, मी शेवटपर्यंत तुमचा नोकर म्हणून चांगले काम करेन. त्यासाठी सावरकरांनी माफीनाम्यांवर सही केली होती. यानंतर भारत जोडो यात्रेवर भाजपकडून जोरदार टिकास्त्र सोडलं जात आहे. तसेच राहुल शेवाळे यांनी भारत जोडो यात्रा थांबवण्याची मागणी देखील केली आहे. त्याला भाजपच्या नेत्यांनी देखील पाठिंबा दिला आहे.
“सावरकर इंग्रजांकडून महिन्याला 60 रूपये पेन्शन घेत होते”; नाना पटोले यांचं वक्तव्य
भारत जोडो यात्रा थांबवण्याची मागणी होत असताना राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अकोला येथे पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलं आहे की, तुम्हाला थांबवायची असेल तर थांबवा, माझी काहीच हरकत नाही. आमची यात्रा तुम्ही रोखूनच दाखवा. असं आवाहन देखील राहुल गांधी यांनी दिलं आहे.
Read also
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला
- “राहुल गांधींच्या वक्तव्याने देशातील काँग्रेसचा जनाधार संपला”
- “शेगावला जा अन् राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा”; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश
- “स्वांतत्र्य लढ्यात योगदान नसलेल्या मातृसंस्थांच्या पिल्लांनी सावरकरांबाबत बोलू नये”