मुंबई : भारत जोडो यात्रेदरम्यान काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर प्रखर शब्दात टिका केलीय. त्याचबरोबर शिंदे गटाचे लोकसभा गटप्रमुख राहुल शेवाळे यांनी तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा बंद पाडण्याची मागणी केली आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सुचक वक्तव्य केलं आहे.
सावरकर तर अंदमानमधील तुरूंगात 10 वर्षांहून अधिक काळ राहिले. आज तर लोक दबावामुळे आणि तुरंगात जाण्याच्या भितीने लोक पक्ष सोडतात, पक्ष विसर्जित करतात, देश सोडून पळून जातात. आमच्यासारखे तर तुरूंगात जाऊन आले आहेत. त्यामुळे जे लोक कधी तरूंगात गेले नाही किंवा जे कधी स्वातंत्र्यसंग्रामामध्ये सहभागी झाले नाहीत तेच लोक सावरकरांबद्दल असं बोलतात. असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीसांना लगावला.
“स्वांतत्र्य लढ्यात योगदान नसलेल्या मातृसंस्थांच्या पिल्लांनी सावरकरांबाबत बोलू नये”
त्यांनी राहुल गांधी यांना देखील इशारा दिला आहे. भारत जोडो यात्रा देशातली हुकूमशाही, महागाई, बेरोजगारी यावर, इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला. अशावेळी सावरकरांचा मुद्दा काढायची गरज नव्हती. आमचीच नव्हे तर काॅंग्रेसच्या नेत्यांचीही अडचण होत आहे. महाविकास आघाडीत अशाने फुटही पडू शकते. असंही ते म्हणाले.
“खरं बोलण्यासाठी हिमंत लागते, अन् ती हिमंत राहुल गांधींकडे आहे”
भारत जोडो यात्रेच्या अजेंड्यामध्ये वीर सावरकरांचा विषय नव्हता. हा तुमचा खासगी विषय आहे. महाराष्ट्राला कायमच वीर सावरकरांचा गर्व वाटत राहणार. संपुर्ण देशाला सावरकरांचा अभिमान वाटतो. उद्धव ठाकरेंनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. वीर सावरकर आमचे आदर्श आहेत. असंही ते म्हणाले.
Read also
- “जयंत पाटील हा राज्यातला बिनडोक नेता”; गोपीचंद पडळकरांची जहरी टिका
- “भारत जोडो यात्रा तुम्ही रोखून दाखवा..!” राहुल गांधींचं भाजपला आवाहन
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला
- “राहुल गांधींच्या वक्तव्याने देशातील काँग्रेसचा जनाधार संपला”