बुलढाणा : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही आज शेगावमध्ये येत आहेत. राहुल गांधींनी सावरकारांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेगाव येथील सभेत काळे झेंडे दाखवण्यासाठी गेलेल्या मनसेच्या नेत्यांना अर्ध्या रस्त्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि दिलीप बापू धात्रे यांना ताब्यात घेतलं आहे.
“आम्हाला जर काळे झेंडे दाखवले तर आम्ही त्यांना गुलाबाचं फुल देऊ”
मनसेच्या नेत्यांची धरपकड गेल्याने राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. पोलीस यंत्रणा मनसे नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड का करत आहे. ?असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल चुकीचे विधान करणारे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा थांबवून त्यांना अटक करा. कायम महाराष्ट्र व राज्याच्या अस्मिता, प्रतीक याबद्दल आकस असणाऱ्या काॅंग्रेसवाल्यांचा माज उतरवलाच पाहिजे. अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली आहे.
“अशाने महाविकास आघाडीत फुटही पडू शकते”; राऊतांचं सुचक वक्तव्य
पोलिसांकडे कोणतेही आदेश नाहीत. लोकशाहीच्या मार्गाने निषेध करण्याचा आम्हाला अधिकार आहे. आमचे विविध ठिकाणांहून कार्यकर्ते आलेले आहेत. सभेच्या ठिकाणी ते पोहचतील. पोलीस अन्यायकारक पद्धतीने आम्हाला इथे थांबवत आहेत. आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही. अशी प्रतिक्रिया नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.
Read also
- काळे झेंडे दाखवण्यासाठी आलेल्या मनसेच्या नेत्यांची धरपकड..! चिखलीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त
- “राहुल गांधींची भारत जोडो नाहीतर मोदी विरोधी जोडो यात्रा”; फडणवीसांचा गुजरातमध्ये हल्लाबोल
- “संजय राठोड विषय निघताच चित्रा वाघ भडकल्या”; म्हणाल्या, “तर मी ही चित्रा वाघ आहे, लक्षात ठेवा”
- “सावरकरांच्या नाही तर देश गांधींच्याच विचाराने पुढे चालवा”; काॅंग्रेसचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
- “राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत बॉम्बने उडवून देऊ..!” धमकीच्या पत्राने खळबळ