मुंबई : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही आज शेगावमध्ये येत आहेत. राहुल गांधींनी सावरकारांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अर्ध्या रस्त्यात पोलीसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
“जयंत पाटील हा राज्यातला बिनडोक नेता”; गोपीचंद पडळकरांची जहरी टिका
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा नसून विरोधकांना जोडण्याची यात्रा आहे. त्यांना आता माहिती झालं आहे की, नरेंद्र मोदी यांच्यासोबत जनता जोडली गेली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी मोदी विरोधक जोडो यात्रा काढली आहे. तसेच काॅंग्रेस आता संपत चालली असून काॅंग्रेसचे असित्त्व टिकवण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली असल्याची टिका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“भारत जोडो यात्रा तुम्ही रोखून दाखवा..!” राहुल गांधींचं भाजपला आवाहन
भारत स्वांतत्र्य झाल्यानंतर महात्मा गांधीजींनीच सांगितलं होतं. की आता काॅंग्रेस विसर्जित करण्याची वेळ आली आहे. तसेच गुजरातमध्ये भ्रष्टाचार वाढत असताना लोकांनीच 27 वर्षापुर्वी काॅंग्रेसला विसर्जित केलं. यानंतर नरेंद्र मोदी यांनी विकसनशील राज्य गुजरात म्हणून निर्माण केलं. त्य़ासाठी नरेंद्र मोदी अनेक तास काम करीत आहेत. असंही ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला
दरम्यान, गुजरातमध्ये आगामी महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी देवेंद्र फडणवीस भाजपचा प्रचार करण्यासाठी गुजरातला गेले आहेत. गुजरातमधील लोकांना संबोधित करताना ते म्हणाले.
Read also
- “संजय राठोड विषय निघताच चित्रा वाघ भडकल्या”; म्हणाल्या, “तर मी ही चित्रा वाघ आहे, लक्षात ठेवा”
- “सावरकरांच्या नाही तर देश गांधींच्याच विचाराने पुढे चालवा”; काॅंग्रेसचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
- “राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत बॉम्बने उडवून देऊ..!” धमकीच्या पत्राने खळबळ
- “आम्हाला जर काळे झेंडे दाखवले तर आम्ही त्यांना गुलाबाचं फुल देऊ”
- “अशाने महाविकास आघाडीत फुटही पडू शकते”; राऊतांचं सुचक वक्तव्य