मुंबई : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेश मध्ये जाणार आहे. त्याआधी राहुल गांधी यांनी अकोला येथे वीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यातील भाजप आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक शहारांत राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलने, घोषणाबाजी दिली जात आहे. यातच राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देणार असल्याचं पत्र मिळालं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दोन दिवसानंतर मध्य प्रदेशमध्ये जाणार आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील 24 नोव्हेंबर रोजी जाणार आहे. त्याआधी इंदुरमधील मिठाईच्या दुकानात अज्ञात व्यक्तींनी एक पत्र पाठवलं आहे. त्या पत्रामध्ये राहुल गांधी यांना बॉम्बने उडवू असं धमकावण्यात आलं आहे. खालसा स्टेडिअममध्ये ते रात्री विश्रांतीसाठी थांबणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
“राहुल गांधींच्या वक्तव्याने देशातील काँग्रेसचा जनाधार संपला”
त्यानंतर मध्य प्रदेशमधील पोलीस यंत्रणां देखील सावध झाली असून पोलीस आणि क्राईम ब्रॉंच या निनावी पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत. हाती आलेल्या बातमीनुसार पोलीस सध्या सीसीटिव्ही माध्यमातून धमकीचं पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत आहे.
Read also
- “आम्हाला जर काळे झेंडे दाखवले तर आम्ही त्यांना गुलाबाचं फुल देऊ”
- “अशाने महाविकास आघाडीत फुटही पडू शकते”; राऊतांचं सुचक वक्तव्य
- “जयंत पाटील हा राज्यातला बिनडोक नेता”; गोपीचंद पडळकरांची जहरी टिका
- “भारत जोडो यात्रा तुम्ही रोखून दाखवा..!” राहुल गांधींचं भाजपला आवाहन
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला