औरंगाबाद : एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अन् बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटातील वाद काही संपता संपेना. दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. यातच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“राहुल गांधींची भारत जोडो नाहीतर मोदी विरोधी जोडो यात्रा”; फडणवीसांचा गुजरातमध्ये हल्लाबोल
मागच्या वर्षी संदीपान भुमरे यांचा शरद साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले होते. त्यावरून अंबादास दानवे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर आरोप केले आहेत. शरद साखर कारखान्यात गद्दार मंत्री संदीपान भुमरे यांनी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मनी लॉंन्ड्रिंगच्या माध्यामातून केलेल्या या व्यवहाराचे पुरावे देखील असल्याचं दानवे यांनी दावा केला आहे.
“संजय राठोड विषय निघताच चित्रा वाघ भडकल्या”; म्हणाल्या, “तर मी ही चित्रा वाघ आहे, लक्षात ठेवा”
साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणातील सर्व पुरावे मी समोर आणणार आहे. असा इशारा दानवेंनी दिला आहे. त्याचबरोबर वॉटरग्रीड, ब्रम्हणगव्हाण उपसा जलसिंचन योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात मंजूरी मिळाली होती. तरी मिंदे व गद्दार मंत्री हे खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही दानवेंनी केला आहे.
“सावरकरांच्या नाही तर देश गांधींच्याच विचाराने पुढे चालवा”; काॅंग्रेसचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
दरम्यान, शहरात एकुण 9 दारूचे दुकान देखील संदीपान भुमरे यांचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच लवकरच सर्वांना घेऊन सदर दारूचे दुकान हे पालकमंत्र्यांचे असल्याचे फलक लावणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे औरंगाबाद मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या दोन्ही गटात राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- राहुल गांधींच्या सभेसाठी लाखोंची गर्दी..! मात्र वीर सावरकरांबाबत बोलण्याचं टाळलं
- “आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज रहा ;” राष्ट्रवादी तयारीला लागली
- “विरोध करणाऱ्यांनी विरोध करावा, भारत जोडो यात्रा अखंड सुरू राहणार”
- “भारत जोडो यात्रा थांबवून राहुल गांधींना अटक करा”; नेत्यांची धरपकड केल्याने मनसे आक्रमक
- काळे झेंडे दाखवण्यासाठी आलेल्या मनसेच्या नेत्यांची धरपकड..! चिखलीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त