नाशिक : लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, बाजार समित्या व इतर सहकारी संस्थांवर जास्तीत जास्त उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून येण्यासाठी नियोजन करा असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केले.
“सावरकरांच्या नाही तर देश गांधींच्याच विचाराने पुढे चालवा”; काॅंग्रेसचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले तरच पक्षाची ताकद ही वाढत असते. त्यामुळे संपूर्ण तयारी करून ताकदीनिशी या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार आणि प्रसार करावा. उमेदवारांनी आपली ताकद आणि तयारी अतिशय प्रभावीपणे करावी आणि जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच येणाऱ्या निवडणूका या विविध पातळ्यांवर लढाव्या लागणार आहे त्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे.
“राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत बॉम्बने उडवून देऊ..!” धमकीच्या पत्राने खळबळ
धर्माच्या वादात किंवा जातीपातीच्या वादात न पडता फुले शाहू आंबेडकरांचे समतेच्या विचारांवर आपण सर्वांनी काम करावे. कारण देशातील सत्ता ही मोजक्या धर्मांध लोकांच्या हातात जाणे हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. विविध संस्थांवर एका विशिष्ट वर्गातील प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत आहे. या संस्थांवर बहुजन समाजातील प्रतिनिधी निवडून द्यायला हवेत. सिनेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी पक्षाचे प्रतिनिधी निवडणूक लढत आहे. या सर्वांना मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्यावे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले जात नसतील तर नागरिकांच्या हितासाठी प्रसंगी आंदोलन उभे करून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्यात यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
“आम्हाला जर काळे झेंडे दाखवले तर आम्ही त्यांना गुलाबाचं फुल देऊ”
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील प्रत्येक विभागात तर ग्रामीण भागात तालुकानिहाय एकदिवसीय शिबिरांचे आयोजन करावे अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पक्षाची सभासद नोंदणी मोहीम लवकरात लवकर पूर्ण करावी. दि.९ डिसेंबर २०२२ पर्यंत पदवीधर मतदारसंघासाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यात यावी, शहर व जिल्ह्यात बूथ कमिट्या तयार कराव्यात, शहरात वार्ड प्रमुख, प्रभाग प्रमुख, विभाग प्रमुख, जिल्ह्यात गट प्रमुख, गणप्रमुख, गाव प्रमुख नेमणूक करून निवडणुकांची परिपूर्ण तयारी करावी अशा सूचना केल्या.
Read also
- “विरोध करणाऱ्यांनी विरोध करावा, भारत जोडो यात्रा अखंड सुरू राहणार”
- “भारत जोडो यात्रा थांबवून राहुल गांधींना अटक करा”; नेत्यांची धरपकड केल्याने मनसे आक्रमक
- काळे झेंडे दाखवण्यासाठी आलेल्या मनसेच्या नेत्यांची धरपकड..! चिखलीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त
- “राहुल गांधींची भारत जोडो नाहीतर मोदी विरोधी जोडो यात्रा”; फडणवीसांचा गुजरातमध्ये हल्लाबोल
- “संजय राठोड विषय निघताच चित्रा वाघ भडकल्या”; म्हणाल्या, “तर मी ही चित्रा वाघ आहे, लक्षात ठेवा”