मुंबई : देशात नेहरू आणि सावरकारांवरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अकोला येथे सावकर इंग्रजांकडून पेन्शन घेत असल्याचं वक्यव्य केलं होतं. त्यानंतर भाजप, मनसे एका बाजूला तर काॅंग्रेस दुसऱ्या बाजूला उभी राहिली आहे. तर शिवसेनेने देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्याला असहमती दर्शवली आहे. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काळे झेंडे दाखवण्यासाठी आलेल्या मनसेच्या नेत्यांची धरपकड..! चिखलीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त
सावकरांविषयी वक्तव्य केल्यानंतर सावरकरांचे पणतू रणजित सावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली त्यानंतर लगेचच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधींच्या वक्तव्याला पाठिंबा दिला. त्यामुळे रणजित सावकर आणि तुषार गांधी हे आमनेसामने आल्याचं दिसून आलं.
“राहुल गांधींची भारत जोडो नाहीतर मोदी विरोधी जोडो यात्रा”; फडणवीसांचा गुजरातमध्ये हल्लाबोल
सावरकर आणि नेहरू यांच्याविषयी राज्यातील नेते चिखलफेक करत असताना संजय राऊतांनी त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी या सगळ्यांविषयी कुणाला काही सांगण्याची गरज नाही. देशाच्या स्वांतत्र्यलढ्यात प्रत्येकांच स्थान आणि योगदान आहे. कुणीही काही बोलल्याने, लोकांच्या ज्ञानात फार बदल होणार नाही. त्यामुळे सावरकरांबाबत जो काही वाद सुरू आहे, त्यावर फार बोलू नये. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“संजय राठोड विषय निघताच चित्रा वाघ भडकल्या”; म्हणाल्या, “तर मी ही चित्रा वाघ आहे, लक्षात ठेवा”
आमच्यासाठी सावरकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, नेहरू ज्यांनी सातंत्र्यचळवीत आपल्या सुखाचा त्याग केला आहे. सगळ्यांच्या मनात या नेत्यांबद्दल आदर आहे. देश निर्मितीसाठी या लोकांनी त्याग केला आहे. ते लोक जिवंत नाहीत. त्यांच्याविरोधात कुणीही चिखलफेक करू नये. असा सल्ला देखील संजय राऊतांनी राज्यातील राजकीय नेत्यांना दिला आहे.
Read also
- “शरद साखर कारखान्यात मोठा भ्रष्टाचार, पुराव्यासकट बाहेर काढणार”; दानवेंचा संदीपान भूमरेंना इशारा
- राहुल गांधींच्या सभेसाठी लाखोंची गर्दी..! मात्र वीर सावरकरांबाबत बोलण्याचं टाळलं
- “आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज रहा ;” राष्ट्रवादी तयारीला लागली
- “विरोध करणाऱ्यांनी विरोध करावा, भारत जोडो यात्रा अखंड सुरू राहणार”
- “भारत जोडो यात्रा थांबवून राहुल गांधींना अटक करा”; नेत्यांची धरपकड केल्याने मनसे आक्रमक