औरंगाबाद : राज्यात स्वांतत्र्यवीर सावरकरांबाबदचा वाद संपता न संपता अजून पुन्हा एक वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी यांची तुलना केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून काॅंग्रेसने राज्यपालांवर जहरी टिका केली आहे.
इडीच्या अटकेत असलेल्या आपच्या नेत्याला VIP सेवा..! व्हिडीओ व्हायरल, भाजपचा निशाणा
राज्यपालांच्या वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्या बुद्धीवर होताना दिसतोय. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही करत सुटलेत. काळ जुना असो किंवा नवा छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी नेहमीच आदर्श असतील. तुमचे आदर्श तुम्हाला लख लाभो, डोक्यावर घेऊन नाचा त्यांना..! असं म्हणत काॅंग्रेसने राज्यपालांचा समाचार घेतला आहे.
“आम्ही म्हणू श्री हरी, तुम्ही करा मोदी मोदी”; अन् भाजप नेत्याला राष्ट्रवादीच्या नेत्यानं डिवचलं
राज्यपालांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी देखील आक्रमक झाली आहे. काळ कुठलाही असो. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व लोकांसाठी आदर्शचं आहेत. राहतील. मर्यादित काळापुरते आदर्श व्हायला ते काय भाजपचे नेते नाहीत. राज्यपालांनी बहुजन महापुरूषाचा अपमान करण्याचा विडा हाती घेतला आहे का ? असा सवाल राष्ट्रवादीचे युवा नेते सुरज चव्हाण यांनी केला आहे.
“देशासाठी ज्यांनी त्याग केलाय, त्यांच्याविषयी कुणीही चिखलफेक करू नये”; संजय राऊत
दरम्यान, मराठवाडा विद्यापीठातील पदवी संमेलनात बोलताना राज्यपाल म्हणाले की, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण? तेव्हा आम्ही सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे. ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिर किंवा आदर्श कोण ? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. तुम्हाला महाराष्ट्रातच मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. असंही ते म्हणाले.
Read also
- “मराठवाडा विद्यापीठासाठी आंबेडकर अन् यशवंत चव्हाणांचं मोठं योगदान”; शरद पवार
- राज्यपालांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले की,”शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श…”;
- “गुजरातच्या धर्तीवर उतरली भाजपच्या मुख्यमंत्र्यांची फौज”; निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला
- “सावरकरांचे नाव सोयीनुसार वापरून राजकरण करण्याचा भाजपचा डाव”; सुषमा अंधारे
- “नारायण राणेंचं विधान म्हणजे चिंटूचे जोक”; राणेंचा तो दावा गोऱ्हेंनी फेटाळला