पुणे : देशात महागाई, बेरोजगारी, आणि शेतकरी आत्महत्या अशा मुद्यांवरून गेले अनेक दिवस विरोधक सत्ताधारी भाजपवर टिका करीत आहे. अनेकदा राष्ट्रवादी या मुद्यांवरून रस्त्यावर उतरून नरेंद्र मोदी यांचा निषेध केला आहे. परंतु काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांचं कौतुक केलं आहे. तसेच मोदी हे माझे आवडते पंतप्रधान असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
“मराठवाडा विद्यापीठासाठी आंबेडकर अन् यशवंत चव्हाणांचं मोठं योगदान”; शरद पवार
काल पिंपरी येथे मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशानांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या अधिवेशनात राज्यातील अनेक महत्वाचं नेते उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या विरोधात मी लिहीत नाही. ते काही चांगल्या गोष्टी देखील करत आहेत. नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान आहेत. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
राज्यपालांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले की,”शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श…”;
त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी भारत जोडो यात्रेसंदर्भात देखील भाष्य केलं आहे. काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी चांगला प्रयोग करत आहेत. भारत जोडो एक वेगळा प्रयत्न आहे. भारत जोडो यात्रा ही फक्त राहुल गांधीची यात्रा नाही तर सर्व भारतीयांची आहे. असंही त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. आमच्या छत्रपतींच्या विरोधात बोलणार असाल तर आम्ही खपवून घेणार नाही. चुक एकदा होऊ शकते. मात्र वारंवार करणे म्हणजे ती त्यांची चॉईस असंही त्या म्हणाल्या.
“गुजरातच्या धर्तीवर उतरली भाजपच्या मुख्यमंत्र्यांची फौज”; निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला
दरम्यान, काल पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी महिला पत्रकारांविषयी भाष्य केलं आहे. महिला पत्रकार साडी का घालत नाही. त्या जिन्स का घालतात? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. त्यावरून त्यांच्यावर टिका केली जात आहे. अलिकडेच संभाजी भिडे यांनी टिकली लावली नाही म्हणून मी तुझ्याशी बोलणार नाही. अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीने राण पेटवलं होतं. त्यातच आता सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न उपस्थित केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून पुरूषांनी वक्तव्या केल्यानंतर निदर्शने अन् स्त्रीने जर काही भाष्य केलं तर काहीच नाही. असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Read also
- “आमचे वैचारिक व्यासपीठ एकच, दोन्ही विचारांचे वारसे घेऊन चालतोय”; उद्धव ठाकरे
- “हीच संवेदनशीलता एका नेत्याला लोकनेता बनवते”; अन् एका महिलेच्या खांद्यावरील बॅग राहुल गांधींनी घेतली
- या 8 प्रश्नाचं उत्तर देईल का खोके सरकार ? आदित्य ठाकरे यांचे शिंदेंना सवाल
- “कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा”; महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर मनसेही आक्रमक
- “राज्यपालांच्या वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्या बुद्धीवर होताना दिसतोय”; काॅंग्रेसची जहरी टिका