बुलढाणा : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा फक्त आज आणि उद्या महाराष्ट्रात असणार आहे. त्यानंतर ते मध्यप्रदेशमध्ये जाणार आहेत. यातच आज देशाच्या पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने आज राहुल गांधी यांच्यासोबत असंख्य महिला पायी चालल्यात. मात्र यावेळी राहुल गांधी यांनी सोबत चालत असलेल्या एका महिलेच्या पाठीवरील बॅग आपल्याकडे घेतल्याने त्यांचं कौतुक केलं जात आहे.
“गुजरातच्या धर्तीवर उतरली भाजपच्या मुख्यमंत्र्यांची फौज”; निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला
आज सकाळी भारत जोडो यात्रेला सुरवात झाली. माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त शक्ती वॉकचा निर्णय घेतला गेला असल्याने बऱ्याच महिला राहुल गांधींसोबत चालत होत्या. अचानक राहुल गांधींची नजर एका ताईवर गेली, जी बॅग घेऊन त्यांच्यासोबत चालण्याचा प्रयत्न करत होती. त्या ताईच्या खांद्यावरील बॅग जड होती आणि राहुल गांधींनी ते पाहिले होते. क्षणाचाही विलंब न करता ते एका भावाप्रमाणे पुढे सरसावले आणि त्या ताईच्या खांद्यावरील बॅग स्वतःच्या खांद्यावर घेतली.
“सावरकरांचे नाव सोयीनुसार वापरून राजकरण करण्याचा भाजपचा डाव”; सुषमा अंधारे
अगदी तशीच जशी आपण घेतो किंवा कुठलाही सर्वसामान्य माणूस घेतो. तसं पाहायला गेलं तर ही काही मोठी गोष्ट नव्हती. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हजारो किलोमीटरची पदयात्रा, हजारो लोकांनी घेरलेलं असताना सर्वांशी बोलत, भेटीगाठी घेत चालत असताना इतकं संवेदनशील राहणं प्रत्येकालाच जमत नाही. पण हीच संवेदनशीलता एका नेत्याला लोकनेता बनवते आणि राहुल गांधींचे हेच वैशिष्ट्य सध्या देश पाहत आहे. सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करुन राहुल गांधींची प्रतिमा मलीन करु पाहणाऱ्यांना एवढी साधी गोष्ट समजत नाही की रात्री काळोखाचं साम्राज्य कितीही मोठं असलं तरी ते सूर्याला उगवण्यापासून रोखू शकत नाही. भारत जोडो यात्रेमधून राहुल गांधींच्या रूपाने भारताच्या अपेक्षांचा आणि विश्वासाचा नवा सुर्योदय होत आहे. यात्रा सुरु आहे आणि द्वेषावर भारी पडते आहे. असं काॅंग्रेसने आपल्या पोस्टमध्ये देखील म्हटलं आहे.
Read also
- या 8 प्रश्नाचं उत्तर देईल का खोके सरकार ? आदित्य ठाकरे यांचे शिंदेंना सवाल
- “कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा”; महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर मनसेही आक्रमक
- “राज्यपालांच्या वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्या बुद्धीवर होताना दिसतोय”; काॅंग्रेसची जहरी टिका
- “मराठवाडा विद्यापीठासाठी आंबेडकर अन् यशवंत चव्हाणांचं मोठं योगदान”; शरद पवार
- राज्यपालांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले की,”शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श…”;