मुंबई : शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर काल एकाच व्यासपीठावर एकत्र बघायला मिळाले. मुंबईत प्रबोधनकार डॉट. कॉम या संकेतस्थळाच्या उद्धाटनाप्रसंगी ते एकत्र आले होते. याआधी जर शिवसेनेने आम्हाला युतीसंदर्भात प्रस्ताव दिला तर आम्ही तो स्विकारू. अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली होती. त्यातच मध्ये या कार्यक्रमाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. त्यामुळे अनेक चर्चांना ऊत आलं होतं.
राज्यपालांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले की,”शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श…”;
उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांचं यावेळी भरभरून कौतुक केलं. आज आम्ही पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलो आहोत. मात्र आमचे वैचारिक व्यासपीठ एकच आहे. याच कारणामुळे एकत्र येण्यात आम्हाला अडचण आली नाही. आम्ही दोन्ही विचारांचे वारसे घेऊन पुढे चालत आहोत. माझी आणि प्रकाश आंबेडकर यांची ओळख नाही, असे नाही. आम्ही बोलतो, भेटतो. पण त्यांची भेट घ्यायची म्हणजे वेळ काढून भेटायला हवं. कारण माहिती आणि ज्ञान याचा धबधबा प्रकाश आंबेडकर आहेत. त्यामुळे त्यांना भेटायचं म्हणजे मिनिटांचं गणित नसायला हवं. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“गुजरातच्या धर्तीवर उतरली भाजपच्या मुख्यमंत्र्यांची फौज”; निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला
त्याचबरोबर एका बाजूला आपण मुस्लीम समाजात दडपशाही आहे, लोकशाही नाही, अशी दुषणं देतो. पण त्याचवेळी वैदिक धर्मातही लोकशाही नाही, याचा विचार आपण का करत नाही. वैदिक धर्मात व्यवस्था मानण्याची सक्ती आहे. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच आम्ही एकत्र कधी येणार ? हे निवडणुका कधी लागतील त्यावर अवलंबून आहे. आता लागल्या तर ताबडतोब. नंतर लागल्या तर नंतर अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
“सावरकरांचे नाव सोयीनुसार वापरून राजकरण करण्याचा भाजपचा डाव”; सुषमा अंधारे
दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप आगामी काळातील निवडणुका एकत्रित लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका युतीत लढण्याचे संकेत पक्षातील नेत्यांनी दिले आहेत. मात्र यामध्ये काॅंग्रेस आणि शिवसेनेशी युती करू मात्र राष्ट्रवादीशी नाही. अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना या भेटीनंतर तसेच भविष्यातील निवडणुकांसदर्भात काय भूमिका घेणार त्याकडे लक्ष्य असणार आहे.
Read also
- “हीच संवेदनशीलता एका नेत्याला लोकनेता बनवते”; अन् एका महिलेच्या खांद्यावरील बॅग राहुल गांधींनी घेतली
- या 8 प्रश्नाचं उत्तर देईल का खोके सरकार ? आदित्य ठाकरे यांचे शिंदेंना सवाल
- “कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा”; महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर मनसेही आक्रमक
- “राज्यपालांच्या वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्या बुद्धीवर होताना दिसतोय”; काॅंग्रेसची जहरी टिका
- “मराठवाडा विद्यापीठासाठी आंबेडकर अन् यशवंत चव्हाणांचं मोठं योगदान”; शरद पवार